युनुस सरकारची मुस्कटदाबी; चिन्मय दास यांना जामीन नाहीच

बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयात ११ हिंदू वकिलांचा युक्तिवाद

    02-Jan-2025
Total Views | 44

Chinmay Krishna Das

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Chinmay Krishna Das Update)
बांगलादेशात मुहम्मद युनुस यांचे अंतरिम सरकार आल्यापासून हिंदू अल्पसंख्याकांवर अत्याचाराचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. इस्कॉन प्रभु चिन्मय कृष्ण दास यांना देशद्रोहाच्या खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. महिना उलटूनही अद्याप त्यांना जामीन मंजूर झालेला नाही. चटगाव मेट्रोपॉलिटन कोर्टाचे सत्र न्यायाधीश मोहम्मद सैफुल इस्लाम यांनी गुरुवार, दि. २ जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीनंतर चिन्मय कृष्ण दास यांचा जामीन फेटाळल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयात तब्बल ११ हिंदू वकिलांनी चिन्मय दास यांची बाजू मांडली होती.

यापूर्वी झालेल्या दोन सुनावणींमध्ये चिन्मय कृष्ण दास यांच्याबाजूने युक्तिवाद मांडणाऱ्या वकिलांना न्यायालयात हजर राहू दिले नव्हते. अॅड. रेमण रॉय यांच्यावर इस्लामिक कट्टरपंथींकडून जीवघेणा हल्ला झाला होता. त्यानंतर बांगलादेश सर्वोच्च न्यायालयाचे हिंदू वकील रवींद्र घोष यांच्यावरही हल्ला झाल्याचे समोर आले होते. ४० वकिलांच्या एका गटाने त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.

अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121