वर्षाताईंनी काही काम केलं नाही तरी चालेल! कारण ज्यांना हरवलं ते तुमच्या विरोधातच पाच वर्षे काम करणार होते!

    21-Sep-2024
Total Views | 202
 
Ujjwal Nikam
 
मुंबई : वर्षाताई गायकवाड यांनी गेल्या बारा वर्षांमध्ये काही काम केले नाही तरीही चालेल, मात्र ज्यांचा तुम्ही पराभव केला ते तुमच्याविरोधात गेल्या पाच वर्षे काम करत होते, असे प्रतिपदन कट्टरपंथीने केले आहे. नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली. त्या निवडणुकीत काँग्रेस खासदार वर्षा गायकवा़ड विरूद्ध शिवसेना नेते आणि वकील उज्ज्वल निकम यांच्यात लढत झाली होती. या लढतीनंतरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
मुंबई भाजप या x ट्विटर अकाऊंटवर भाजपाने शांतीदुत म्हणवून घेणाऱ्यांची पोल खोलली आहे. त्यांनी ट्विट करत जिहाद्यांच्या उन्मादावर निशाणा साधला आहे. त्यांनी लिहिले की, बघा काय भावना आहे शांतीदुतांची, जरी काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड काम करत नसेल तरी ते ठीक आहे, कारण त्यांनी ॲड. उज्ज्वल निकम यांना पराभूत केले आहे. ज्या उज्ज्वल निकम यांनी मुंबईवर हल्ला करणाऱ्या अजमल कसाबला फाशी दिली, ज्यांच्यामुळे १९९२ च्या बॉम्ब स्फोटातील दोषींना शिक्षाही झाली होती, असे ट्विट करत त्यांनी सद्यस्थिती दाखवून दिली आहे.
 
 
ज्या उज्ज्वल निकम यांनी २६/ ११ च्या मुंबई बॉम्ब स्फोट हल्ल्यातील आरोपी आणि आतंकवादी अजमल कसाबला फाशी दिली. कायद्याचा अभ्यास करत त्यांनी देशाला आणि जवानांना न्याय मिळवून दिला. आता त्यांचा विरोध करणाऱ्या अल्पसंख्यांनी गरळ ओकल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121