राहुल गांधी गाझावर बोलतात पण बांगलादेशविरोधात मूग गिळून गप्प बसतात! भाजप नेत्याने राहुल गांधींना फटकारले

    09-Aug-2024
Total Views | 73

 

Rahul Gandhi...
  
 
नवी दिल्ली (Rahul Gandhi) : बांगलादेशात काही दिवसांपासून हिंदूंवर हल्ला होत आहे. हिंदूंची घरे उद्ध्वस्त केली जात आहेत. मंदिरांचीही तोडफोड केली जात आहे. याप्रकरणावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी मूग गिळून गप्प आहेत. राहुल गांधी गझावर अनेकदा बोलले आहेत. मात्र,बांगलादेशविरोधात बोलताना मूग गिळून गप्प का आहेत? असा तिखट सवाल भाजप नेते अनुराग ठाकूर यांनी ९ ऑगस्ट रोजी केला आहे.

 

विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे बांगलादेशातील अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेबाबत बोलत नाहीत. जेव्हा बांगलादेशात नवीन सरकार स्थापन झाले. त्यावेळी राहुल गांधींनी यावर कोणतेही भाष्य केले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बांगलादेशात सरकार स्थापन केल्यानंतर नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच बांगलादेशातील सुरू असलेल्या हिंसाचारावरही त्यांनी भाष्य केले. मात्र राहुल गांधींनी शुभेच्छा दिल्या आणि बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचारावर एकही अक्षर काढले नाही.

 

काय म्हणाले होते नरेंद्र मोदी?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युनूस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यावर शुभेच्छा दिल्या. तसेच नरेंद्र मोदींनी शांतता आणि बांगलादेशात असलेले अल्पसंख्यांकांचे व्यवस्थापन व्हावे, असे सरकारला सांगितले. बांगलादेशातील अल्पसंख्यांकांसाठी एकत्र काम करू असे मोदी म्हणाले होते. तसेच राहुल गांधी यांनी भाष्य केलेय  

दरम्यान, प्राध्यापक मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेतल्याबद्दल राहुल गांधींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. मात्र बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसावर भाष्य केले नाही, असा दावा अनुराग ठाकूर यांनी केला आहे.

 
अग्रलेख
जरुर वाचा
राज्यात १ लाख ३५ हजार ३७१ कोटींच्या गुंतवणूक प्रस्तावांना मंजुरी ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; थ्रस्ट सेक्टर आणि उच्च तंत्रज्ञानाधारित उद्योगांचा समावेश

राज्यात १ लाख ३५ हजार ३७१ कोटींच्या गुंतवणूक प्रस्तावांना मंजुरी ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; थ्रस्ट सेक्टर आणि उच्च तंत्रज्ञानाधारित उद्योगांचा समावेश

राज्यातील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी बुधवारी उद्योग विभागाच्या मंत्रीमंडळ उपसमितीने राज्यातील थ्रस्ट सेक्टर आणि उच्च तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांच्या १ लाख ३५ हजार ३७१ कोटी ५८ लाख रुपयांच्या प्रस्तावांना मान्यता दिली. यामुळे राज्यात सुमारे १ लाख प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रकल्पांमुळे तांत्रिक नवकल्पना, संशोधन, विकास व रोजगार निर्मितीला चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121