‘पुष्पा २' अन् ‘छावा’ची बॉक्स टक्कर, विकी कौशल आणि अल्लू अर्जून भिडणार

    16-Aug-2024
Total Views | 45

vicky and arjun 
 
 
 
मुंबई : लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित ‘छावा’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या ऐतिहासिकपटात अभिनेता विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर व्हायरल झाला होता. पण आता या चित्रपटाबद्दल आणखी एक बातमी समोर येत आहे ती म्हणजे विकी कौशलच्या छावा चित्रपटाची टक्कर अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा २’ सोबत होणार आहे.
 
‘छावा’ चित्रपटाच्या टीझरची एक क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून टीझरमध्ये दाखवल्याप्रमाणे ६ डिसेंबर २०२४ रोजी ‘छावा’ प्रदर्शित होणार असे दिसत आहे. तर, ‘पुष्पा २’ हा चित्रपटही त्याच दिवशी म्हणजे ६ डिसेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर दोन मोठ्या कलाकारांचे चित्रपट आमने सामने येणार आहेत.
 
अल्लू अर्जुनचा 'पुष्पा: द राइज' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला, त्यानंतर चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदाना, फहद फाजिल सुनील, राव रमेश, अनुसया भारद्वाज आणि जगदीश असे अनेक कलाकार दिसणार आहेत. तर ‘छावा’ या चित्रपटात देखील विकी कौशलसोबत रश्मिका मंदाना झळकणार आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
मोदी सरकारने ११ वर्षाच्या कारकिर्दीत देशाच्या सीमेसह अर्थव्यवस्था मजबूत केली तंत्रज्ञान सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवले भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचे गौरवोद्गार

मोदी सरकारने ११ वर्षाच्या कारकिर्दीत देशाच्या सीमेसह अर्थव्यवस्था मजबूत केली तंत्रज्ञान सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवले भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचे गौरवोद्गार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने विकसित भारताच्या अमृतकाळामध्ये सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची नवी यात्रा सुरु केली आहे. मोदी सरकारच्या प्रत्येक योजनेमध्ये जनकल्याण, सामान्य माणसाचे जीवन सुखकर करण्यासाठीच्या योजना तसेच देशाला जागतिक स्तरावर नवी ओळख देण्याचा हेतू आहे. गेल्या ११ वर्षात मोदी सरकारने देशाच्या सीमेसह, अर्थव्यवस्था मजबूत केली. तसेच तंत्रज्ञानाला सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवले, असे गौरवोद्गार भाजपा विधानपरिषद गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत काढले...

पावसात वीज यंत्रणेपासून सतर्क राहण्याचे महावितरणचे आवाहन

पावसात वीज यंत्रणेपासून सतर्क राहण्याचे महावितरणचे आवाहन

वादळी व संततधार पाऊस किंवा अतिवृष्टी, पूर परिस्थिती, झाडे व फांद्या कोसळल्याने तुटलेल्या वीजतारा, विजेची उपकरणे किंवा यंत्रणेमधील शॉर्टसर्कीट आदींमुळे वीज अपघाताची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सार्वजनिक व घरगुती वीजयंत्रणा, उपकरणांपासून सतर्क राहावे. तसेच पूर किंवा अतिवृष्टीमुळे कोणत्याही क्षणी प्रतिकूल स्थिती, धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येतो. अशा स्थितीत वीज ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121