‘कान्स’ स्क्रीनिंगनंतर ‘मंथन’ ४८ वर्षांनी पुन्हा थिएटर्समध्ये; कधी, कुठे होणार प्रदर्शित? जाणून घ्या

    28-May-2024
Total Views | 30

manthan 
 
 
मुंबई : प्रतिष्ठित कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये झळकलेला ४८ वर्षांपुर्वीचा मंथन चित्रपट आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहण्याची संधी मिळणार आहे. ‘मंथन’ परत एकदा भारतात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार असून याबाबत फिल्म हेरिटेज फाऊंडेशनने माहिती दिली.
 
मंथन हा चित्रपट ५ लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी गोळा केलेल्या पैशांतून उभारलेला चित्रपट आहे. १९७६ साली आलेल्या या चित्रपटाच्या निर्मितीसाठी या शेतकऱ्यांनी आर्थिक मदत केली होती. प्रत्येकी दोन रुपये शेतकऱ्यांनी दान केले होते.
दरम्यान, कान्सला झालेल्या स्क्रिनिंगला अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी त्यांच्या अभिनेत्री पत्नी रत्ना पाठक शाह, दिवंगत सहकलाकार स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बर, डॉ. कुरियन यांची कन्या निर्मला कुरियन, अमूल एमडी जयेन मेहता आणि एफएचएफ संस्थापक शिवेंद्रसिंह डुंगरपूर उपस्थित होते.
 

manthan 
 
रिस्टोअर्ड ‘मंथन’ १ आणि २ जून रोजी भारतातील काही मोजक्याच शहरांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार. मुंबई, नवी दिल्ली, आणंद, राजकोट, चेन्नई, कोची, हैदराबाद, जयपूर, बडौदा, सूरत आणि चंदीगडसह ३८ शहरांमध्ये पुन्हा हा चित्रपट प्रदर्शित केला जाईल.
श्याम बेनेगल दिग्दर्शित या चित्रपटाची कथा विजय तेंडुलकर आणि डॉ.कुरियन यांनी लिहिली होती. स्मिता पाटीलशिवाय नसीरुद्दीन शाह, गिरीश कर्नाड, कुलभूषण खरबंदा, मोहन आगाशे, अनंत नाग आणि अमरीश पुरी यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121