आयपीएल 2024 फायनलसाठी गुगलकडून खास 'डूडल'!

    26-May-2024
Total Views | 32
ipl final kkr vs srh doodle



मुंबई :      यंदा आयपीएलच्या १६व्या मोसमात कोलकाता नाईट रायडर्स विरुध्द सनरायझर्स हैदराबाद यांच्यात अंतिम सामना खेळविला जाणार आहे. अंतिम सामना एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे खेळविण्यात येणार असून फायनलसाठी गुगलकडून खास 'डूडल' बनविले आहे. या डूडलमध्ये खेळपट्टी, बॅट, बॉल व फायनलसंदर्भातील अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे. कोलकाता विरुध्द हैदराबाद यांच्यात चेन्नईमध्ये फायनल होणार आहे.

दरम्यान, संध्याकाळी ७:३० वाजता हे दोन्ही संघ एकमेकांविरोधात लढत होणार असून संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष फायनलकडे लागले आहे. अंतिम सामन्यात पाऊस पडण्याची शक्यता असून या मैदानावरील खेळपट्टीची चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. चेपॉकवरील फायनल सामन्यात धावांचा पाऊसदेखील पडू शकतो असा अंदाज ऑफिशियलकडून वर्तविला जात आहे.

विशेष अंतिम सामन्याकरिता खेळपट्टीची तयारी वानखेडे मैदानाप्रमाणे लाल मातीची असणार आहे असं पीच क्युरेटर सांगितल्याचे समोर आले आहे. कोलकाता नाईट रायडर्स की सनरायझर्स हैदराबाद यांच्यात जेतेपदासाठी लढत होणार आहे. आतापर्यंत हे दोन्ही संघ २७ वेळा आमनेसामने आले आहेत. यात कोलकात्याने १८, तर हैदराबादने ९ वेळा विजय मिळवला आहे.

पावसामुळे सामना रद्द झाल्यास काय होणार!

कोलकाता विरुध्द हैदराबाद यांच्यातील अंतिम सामन्यात पावसाचे व्यत्यय येण्याची शक्यता असून सामना पावसामुळे रद्द झाल्यास तो राखीव दिवशी खेळविला जाणार आहे. तसेच, राखीव दिवशी म्हणजेच सोमवारीदेखील पावसामुळे सामन्यात व्यत्यय आल्यास ५-५ षटकांचा सामना खेळवण्याचा प्रयत्न केला जाईल. तरीदेखील शक्य न झाल्यास सुपर ओव्हरमार्फत निकाल लावण्यात येईल. परिणामी, सामना झालाच नाही तर गुणतालिकेत अग्रस्थानी असलेल्या संघाला विजयी घोषित केले जाईल.





अग्रलेख
जरुर वाचा
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या बांधणीला आता गती मिळणार आहे. प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्‍या जुळ्या बोगद्यासाठी आवश्‍यक असलेली १९.४३ हेक्‍टर वनजमीन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडे वळती करण्‍यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता मिळाली आहे. त्‍यानुसार, अटी व शर्तींचे अनुपालन तसेच पूर्ततेची ..

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

१ हजार ६५० गावांमध्ये प्राथमिक, तर ६ हजार ५५३ गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नाहीत राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांपैकी सुमारे १८ हजार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे. तर १ हजार ६५० गावांत प्राथमिक आणि ६ हजार ५५३ गावांत उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नाहीत. विद्यार्थी संख्येत घट झाली असली, तरी त्या शाळा सुरूच राहतील आणि त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, तेथे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याची माहिती ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121