पायलटच्या प्रसंगावधानामुळे 'केदारनाथ'मध्ये टळली मोठी दुर्घटना

    24-May-2024
Total Views | 95
 KEDARNATH
 
डेहराडून : केदारनाथमध्ये पायलटच्या प्रसंगावधानामुळे मोठी हेलिकॉप्टर दुर्घटना टळली आहे. भाविकांना केदारधाम मंदिरात घेऊन जाणारे हेलिकॉप्टर तांत्रिक बिघाडामुळे अपघातातून थोडक्यात बचावले. टेक ऑफ केल्यानंतर अचानक झालेल्या बिघाडामुळे हेलिकॉप्टरचा तोल सुटला आणि हवेत गटांगळ्या घेण्यास सुरूवात केली, मात्र पायलटने प्रसंगावधान दाखवत हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करून सर्व प्रवाशांना सुखरूप वाचवले.
 
या अपघातात हेलिकॉप्टरमधील सहा प्रवाशांपैकी कोणीही जखमी झाले नाही. या घटनेमुळे केदारनाथ मंदिरात भाविकांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरच्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आहे. याआधीही केदारधाममध्ये हेलिकॉप्टरचे अनेक अपघात झाले आहेत, त्यापैकी बहुतांश हेलिकॉप्टर एकामागून एक टेक ऑफ होत असल्याने त्यांची देखभाल योग्य प्रकारे न केल्याने हे अपघात झाल्याचं समोर आले होते.
  
  
उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यातील केदारनाथ धामला जाण्यासाठी पायी मार्गासोबतच हवाई सेवाही उपलब्ध आहे. त्यासाठी अनेक ठिकाणी हेलिपॅड बांधण्यात आले आहेत. शुक्रवारी क्रिस्टन एव्हिएशन कंपनीच्या हेलिकॉप्टरने सकाळी ७ वाजता ६ भाविकांसह फाटा येथून केदारनाथ धामसाठी प्रस्थान केले. धाम येथे बांधण्यात आलेल्या हेलिपॅडच्या आधी हेलिकॉप्टरच्या राऊटरमध्ये समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे हेलिकॉप्टरचा तोल सुटू लागला.
 
 
पायलटने हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही. यानंतर हेलिकॉप्टरने हेलिपॅडच्या जवळपास १०० मीटर आधी इमर्जन्सी लँडिंग केले. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, त्यात कोणीही जखमी नसल्याची पुष्टी झाली आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121