मुंबईचा डबेवाला जातोय सुट्टीवर

२० ते २६ एप्रिलपर्यंत डबेवाला जाणार सुट्टीवर

    19-Apr-2024
Total Views | 130

mumbai cha dabewala
 
 
मुंबई, दि.१९ : मुंबईची ओळख असलेले आणि ज्यांच्या नेटवर्कवर लाखो मुंबईकरांची क्षुधा शांत होते, ते डबेवाले सोमवार, २० एप्रिलपासून सहा दिवसांच्या रजेवर चालले आहेत. २० ते २५ एप्रिलपर्यंतच्या सहा दिवसांच्या कालावधीत मुंबईतील बहुतांश डबेवाले आपापल्या गावांतील यात्रांमध्ये सहभागी होणार आहेत. २६ एप्रिलपासून पुन्हा एकदा डबेवाले मुंबईकरांच्या सेवेत हजर होतील. मुंबईची ओळख असलेले आणि ज्यांच्या नेटवर्कवर मुंबईकरांची क्षुधा शांत होते, ते डबेवाले शनिवार २० एप्रिलपासून सहा दिवसांच्या रजेवर आहेत. २० ते २५ एप्रिलपर्यंतच्या सहा दिवसांच्या कालावधीत मुंबईतील बहुतांश डबेवाले आपापल्या गावांतील यात्रांमध्ये सहभागी होणार आहे. २६ एप्रिलपासून पुन्हा एकदा डबेवाले मुंबईकरांच्या सेवेत हजर होतील.
 
मुंबईतील नोकरदार वर्ग हा मोठ्या प्रमाणातील डबेवाल्यांच्या सेवांवर अवलंबून आहे. मुंबईत कार्यालयांमध्ये डबे पोहोचवण्याची करामत साध्य करणारे डबेवाले मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर, अकोला, संगमनेर या भागातील गावांमधून येतात. त्या ठिकाणी गावा कडील कुलदैवतांच्या यात्रा सुरू झाल्या असून त्यात सहभागी होण्यासाठी मुंबईतील डबेवाले गावी जाणार आहेत. त्यामुळे २० ते २५ एप्रिलपर्यंत डबे पोहोचवण्याची सेवा डबेवाल्यांनी बंद ठेवली आहे.
 
मात्र, या सहा दिवसांच्या रविवारची एक सुट्टीचा समावेश आहे. त्यामुळे प्रत्यक्षात डबेवाले पाच दिवस सुट्टी घेणार असून सोमवार, २६ एप्रिलपासून ही सेवा डबेवाले पुन्हा सुरू करणार आहे. २६ एप्रिलपासून पुन्हा सकाळी डबेवाला नेहमीप्रमाणे आपल्या कर्तव्यावर हजर होऊन आपली सेवा देईल. उन्हाळी सुट्टीनिमित्ताने बहुतांश शाळा, कॉलेज, यांना सुट्टी लागली आहे त्या मुळे त्या डब्यांची सेवा बंद आहे. तसेच सरकारी, निमसरकारी कर्मचारी वर्ग उन्हाळी सुट्टीवर गेला आहे. त्यामुळे त्यांची ही सेवा काही प्रमाणात कमी झाली आहे. डबेवाले सुट्टीवर गेल्याने काही ग्राहकांची गैरसोय होणार असल्याने मुंबई डबेवाला असोसिएशनने दिलगिरी व्यक्त केली आहे. ग्राहकांनी या सुट्टीच्या कालावधीतील पगार कापू नये, अशी विनंती “मुंबई डबेवाला असोसिएशनचे” अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी केली आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
पंतप्रधान मोदींमुळे भारताची जगातील प्रतिष्ठा वाढली

पंतप्रधान मोदींमुळे भारताची जगातील प्रतिष्ठा वाढली

“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत हे जागतिक स्तरावरील एक आगळे समीकरण झाले असून, मोदी सरकारच्या कारकिर्दीमुळे भारताची जगातील प्रतिष्ठा वाढली आहे. गेल्या ११ वर्षांत मोदी सरकारच्या विविध योजनांमुळे देशातील गरीब, महिला, युवक, दलित, वंचित आणि समाजाच्या सर्व स्तरांतील जनतेच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला. देशाला अभूतपूर्व प्रतिष्ठा प्राप्त करून दिल्याबद्दल मी मोदी सरकारचे आणि व्यक्तिशः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो व आभारही मानतो”, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदी सरकारच्या तिसऱ्या ..

मुंबई मेट्रो३ वरही सहज ‘टॅप अ‍ॅन्ड ट्रॅव्हल’ करा

मुंबई मेट्रो३ वरही सहज ‘टॅप अ‍ॅन्ड ट्रॅव्हल’ करा 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड'चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण नवीन पेमेंट प्रणालीमुळे प्रवाशांचा प्रवास होणार अधिक सुलभ

मुंबईच्या इतर मेट्रो मार्गांप्रमाणेच आता मुंबई मेट्रो ३वर देखील सहज ‘टॅप अ‍ॅन्ड ट्रॅव्हल’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने 'नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया' आणि 'स्टेट बँक ऑफ इंडिया' यांच्या सहकार्याने मुंबई मेट्रो३वर रुपे एनसीएमसी कार्ड तयार केले आहे. या कार्डचे अनावरण मंगळवार, दि.१० रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121