एलडीएफ सरकारमुळे केरळची अधोगती : प्रकाश जावडेकर

    07-Feb-2024
Total Views | 40
Prakash Javadekar Kerala LDF Government

नवी दिल्ली : केरळमधील एलडीएफ सरकार हे आपले अपयश झाकण्यासाठी मोदी सरकारवर आरोप करत आहे, असा टोला भाजपचे केरळ प्रभारी प्रकाश जावडेकर आणि केंद्रीय राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी पत्रकारपरिषदेत लगावला.
 
मोदी सरकारने १५ व्या वित्त आयोगाच्या शिफारशी स्वीकारून राज्यांना निधी हस्तांतरण ३२ टक्क्यांवरून ४२ टक्के केले. युपीएच्या काळात केवळ ३२ टक्के हस्तांतरण होते. याशिवाय पंचायत आणि जिल्हा परिषदांना ७.५ टक्के अतिरिक्त निधी देण्यात आला आहे. प्रकाश जावडेकर म्हणाले की, मोदी सरकारने जीएसटीची भरपाई म्हणून १४ टक्के वार्षिक वाढीची हमी देण्याचे मान्य केले. २०१७ पासून ५ वर्षांसाठी नुकसानभरपाईची रक्कम हस्तांतरित करून आपली वचनबद्धता पूर्ण केली आहे, जी राज्यांसाठी वरदान ठरली असल्याचे जावडेकर म्हणाले.

एलडीएफ आणि युडीएफच्या धोरणांमुळे केरळ औद्योगिकीकरणात मागे पडल्याचा आरोप जावडेकर यांनी केला. ते पुढे म्हणाले, त्यामुळे राज्यातील उच्चशिक्षित तरुणांना नोकरीसाठी इतर राज्यात व देशात जावे लागत आहे. केरळच्या खराब आर्थिक व्यवस्थापनाचा हा पुरावा आहे. मात्र केरळ सरकार दोषारोपाचे राजकारण करत आहे. केरळ सरकारला राज्याचा आर्थिक गाडा चालवणे शक्य नसल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता जनताच योग्य तो निर्णय घेईल, असेही जावडेकर यांनी नमूद केले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121