राष्ट्रवादी आमदार अपात्रता निकाल - १० महत्त्वाचे मुद्दे!

    15-Feb-2024
Total Views | 85

Pawar

मुंबई :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मूळतः अजित पवार यांच्याकडेच असेल, असा निर्वाळा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. यावेळी निकाल देताना अजित पवारांकडे विधीमंडळातील संख्याबळ असल्याने त्यांच्याकडेच पक्षाची कमान आहे, असे सिद्ध होत असल्याचे नार्वेकर यांनी म्हटले आहे. शरद पवार यांच्या गटाने राष्ट्रवादीतील अजितदादांसोबत गेलेले आमदार अपात्र व्हावेत, अशी मागणी केली होती. मात्र, आता राष्ट्रवादी आणि शरद पवार गटाचे सर्वच आमदार पात्र ठरले आहेत.
 
आमदार अपात्रतेचे १० महत्त्वाचे मुद्दे-
 
१) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कुठलीही फूट पडलेली नाही. मात्र दोन गट तयार झालेले आहेत. प्राथमिक स्तरावर पक्षीय रचना, घटना व विधीमंडळ बळ या त्रिसूत्री वर मत नोंदवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारणी हीच सार्वभौम आहे.
 
२) राष्ट्रवादी काँग्रेसची घटना सर्वात महत्त्वाची आहे. दोन्ही गट त्याला बांधिल आहेत. ३० जून २०२३ ला या पक्षात फूट पडली. अशावेळी नेतृत्त्वाबाबत पक्षाची घटना काय सांगते हे महत्त्वाचं आहे.
 
३) राष्ट्रवादी पक्षात अध्यक्ष पदावर दोघांकडून दावा केला जात आहे. दोन्ही गटांकडून पक्षाच्या घटनेप्रमाणे अध्यक्ष निवड झाली नसल्याचा दावा केला जात आहे. दोन समांतर नेतृत्व याठिकाणी उभे राहिले आहेत. तसेच दोन्ही गटांकडून अपात्रता याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
 
४) आपला अध्यक्ष कसा योग्य हे सिद्ध करण्यासाठी दोन्ही बाजूंनी पुरावे दिले. दोन्ही गटांकडून समांतर दावे करण्यात आले. प्रतिनिधिंच्या निवडणुकीचे पुरावे शरद पवार गटाकडून सादर करण्यात आले नाहीत.
 
५) विधिमंडळ पक्षात बहुमत कुणाचं हा एकमेव निकष शक्य.
 
६) अजित पवार यांना विधिमंडळात बहुमत आहे. त्यामुळे बहुमताआधारे अजित पवार यांची राष्ट्रवादी खरी.
 
७) दोन्ही गटांतील वाद पक्षांतर्गत आहे. कुणीही पक्ष सोडलेला नाही. त्यामुळे दहाव्या सूचीनुसार कोणावर अपात्रतेची कारवाई करता येत नाही.
 
८) अजित पवार आणि शरद पवार दोन्ही गटाचे आमदार पात्र.
 
९) १० व्या सुचीचा वापर हा पक्षातील बहुमताला धमकावण्यासाठी केला जाऊ शकत नाही.
 
१०) राहुल नार्वेकर यांनी शरद पवार गटाच्या तिन्ही याचिका फेटाळल्या.



अग्रलेख
जरुर वाचा
कल्याण लोकलमध्ये

कल्याण लोकलमध्ये 'बोकड प्रवासी'! कुर्ला स्थानकावर गोंधळ, फेरीवाल्यांचा उद्रेक आणि रेल्वे प्रशासनाची गंभीर दुर्लक्ष

कल्याणकडे जाणाऱ्या मुंबई लोकलमध्ये बोकड घेऊन प्रवास करणारा प्रवासी आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ही घटना कुर्ला स्थानकावरून सुरू झाल्याने, या स्थानकावरील अराजकता, प्रचंड गर्दी, फेरीवाल्यांचा वावर आणि रेल्वे प्रशासनाची हलगर्जी पुन्हा एकदा समोर आली आहे.गर्दीच्या तासात झालेल्या या प्रकारामुळे लोकल डब्यात गोंधळ उडाला. बोकड मोकळा फिरत असल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण होतं. काही प्रवाशांनी हा प्रकार मोबाईलवर टिपून सोशल मीडियावर शेअर केला असून, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121