काँग्रेसमध्ये दुसरा भूंकप! आणखी काही आमदार जाणार सोडून!

    12-Feb-2024
Total Views | 373

Maharashtra Congress


मुंबई :
काँग्रेसचे आणखी पाच आमदार राजीनामा देणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नुकताच काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता काँग्रेसमध्ये दुसरा मोठा भूकंप होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
अशोक चव्हाणांसोबत काँग्रेसचे आणखी काही आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. विश्वजीत कदम, जितेश अंतापुरकर, माधव जवळकर, अमित झनक, अमीन पटेल, असलम शेख, सुलभा खोडके, अमर राजूरकर आणि हिरामण खोसकर हे आमदार राजीनामा देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी अशोक चव्हाणांचा राजीनामा स्विकारला आहे. याशिवाय माजी आमदार हनुमंत बेटमोगरेकर, रमेश बागवे, आमदार मोहनराव हंबर्डे हेदेखील अशोक चव्हाणांसोबत असल्याचे सांगण्यात येत आहे. अशोक चव्हाणांसारख्या बड्या नेत्याचा राजीनामा हा काँग्रेससाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
 
याआधीही काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी आणि मिलिंद देवरा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता अशोक चव्हाण यांनीदेखील पक्षाला रामराम ठोकला आहे. दरम्यान, यावर्षी लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. अशातच काँग्रेसला एवढं मोठं खिंडार पडलं आहे.




अग्रलेख
जरुर वाचा
ऊर्जासंपन्न महाराष्ट्रासाठी : पर्यावरणपूरक वीजनिर्मितीचे व्हिजन!

ऊर्जासंपन्न महाराष्ट्रासाठी : पर्यावरणपूरक वीजनिर्मितीचे व्हिजन!

महाराष्ट्र हे वीजनिर्मितीत भारतातील सर्वांत आघाडीचे राज्य. देशात निर्माण होणार्या एकूण विजेच्या १५ टक्के विद्युतनिर्मिती ही एकट्या महाराष्ट्रात होते. परंतु, तरीही मागणीचे प्रमाण हे वीजनिर्मितीपेक्षा जास्त असल्याने आज राज्य सरकार नवीकरणीय ऊर्जानिर्मितीवर भर देत आहे. अशातच नुकतीच राज्य सरकारने मोठी वीजदरकपात जाहीर केली. ज्यामुळे आता पुढील पाच वर्षे वीजबिल वाढणार नाही, तर कमी होणार आहे. तेव्हा राज्यातील वीज ग्राहकांना नेमका हा लाभ कसा मिळणार, यासंबंधी महाराष्ट्र राज्य वीज सूत्रधार कंपनीचे स्वतंत्र संचालक ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121