मुंबई, राज्यातील देवस्थानांच्या इनाम जमिनींवर बेकायदेशीर कब्जा आणि अपहार थांबवण्यासाठी महाराष्ट्र सरकार स्वतंत्र कायदा आणणार असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी विधानसभेत दिली. या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे यांनी औचित्याच्या सूत्रांतर्गत लक्ष वेधले होते.
आ. अहिरे म्हणाल्या की, “राज्यात महसूल आणि वन विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या काही देवस्थानांच्या जमिनी बळकावण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी या जमिनींचा वैध वापर न होता, त्यावर खासगी व्यक्ती व संस्थांनी कब्जा केला आहे. त्यामुळे या जमिनी मूळ देवस्थानांना मिळाव्यात यासाठी सरकारने लक्ष घालावे.” त्यावर राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवस्थानच्या इनाम जमिनीविषयी सरकार कायदा करणार असल्याची माहिती सभागृहात दिली.
'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.