शिवशंभू विचार मंच आयोजित 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर' व्याख्यान संपन्न

    24-Dec-2024
Total Views | 48

Shivshambhu Vichar Manch

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :
शिवशंभू विचार मंच (Shivshambhu Vichar Manch) कोकण प्रांत आयोजित "राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यावर आधारित व्याख्यान आणि हेमाद्री अंक - १३ मोडी हस्तलिखिताचे प्रकाशन" शनिवार, दि. २१ डिसेंबर रोजी मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे (पश्चिम) येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेमाद्री अंकच्या सह संपादिका अश्विनी सुर्वे यांनी केले. सर्व उपस्थित मान्यवरांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून दीप प्रज्वलन केले. यावेळी मंचावर शिव शंभू विचार मंच कोकण प्रांत संयोजक अभय जगताप, इतिहास अभ्यासक व मोडी लिपी प्रशिक्षक सुनील कदम उपस्थित होते.
दरम्यान अभय जगताप यांनी अहिल्यादेवीचें समाजकार्य असो, त्यांची प्रशासन व्यवस्था असो, त्यांनी बंद केलेली सती प्रथा असो, उद्ध्वस्त देवळांच्या पुनर्निर्माणाचे कार्य असो अशा अनेक छोट्या मोठ्या प्रसंगांचे जीवनदर्शन उलगडून सांगितले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त हेमाद्री अंक - १३ मोडी हस्तलिखिताचे प्रकाशन दिलीप बलसेकर यांच्या हस्ते करण्यात आले. श्री बलसेकर यांनी त्यांच्या काही आठवणी व उद्बोधपर भाषण केले. आतापर्यंत जेवढी हेमाद्री अंकाची मोडी हस्तलिखिते प्रकाशित झाली ती सर्व मोडी हस्तलिखिते प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती. अशाप्रकारे सुंदर व्याख्यान व मोडी हस्तलिखित प्रकाशनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
अग्रलेख
जरुर वाचा
एअर इंडियानं १६ विमानं वळवली! लंडनला निघालेलं विमान अर्ध्या तासात माघारी; नेमकं  काय घडलं?

एअर इंडियानं १६ विमानं वळवली! लंडनला निघालेलं विमान अर्ध्या तासात माघारी; नेमकं काय घडलं?

(Air India flights) इस्रायलने शुक्रवारी दि.१३ जून रोजी इराणची राजधानी तेहरानसह वेगवेगळ्या भागांमध्ये हवाई हल्ला केला, ज्यामुळे मध्य-पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव इराणने तातडीने आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. त्यामुळे आता कोणत्याही देशाची विमानं इराणच्या हवाई क्षेत्रामधून उड्डाण करू शकणार नाहीत. याचा भारतीय विमानांना मोठा फटका बसला आहे. इराणने त्यांची हवाई क्षेत्र बंद केल्यामुळे एअर इंडियाच्या १६ विमानांचा मार्ग बदलावा लागला आहे. यापैकी काही विमानं मागे वळवावी लागली. ..

एअर इंडिया विमान अपघातात खुशबू राजपुरोहित यांचा मृत्यू; पतीला भेटण्यासाठी निघाली होती लंडनला

एअर इंडिया विमान अपघातात खुशबू राजपुरोहित यांचा मृत्यू; पतीला भेटण्यासाठी निघाली होती लंडनला

एअर इंडियाच्या ए-१४१ अहमदाबाद-लंडन या विमानाचा उड्डाणाच्या काही कालावधीनंतर अपघात झाला. यात एकूण २४१ प्रवासी आणि २४ विद्यार्थी व डॉक्टर, असे मिळून २६५ जणांचा मृत्यू झाला. राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील खुशबू राजपुरोहित यांचाही या मृतांमध्ये सामावेश होता. खुशबूचा पाच महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. तिचे पती मयूर पुरोहित हे लंडनमध्ये डॉक्टर म्हणून रुग्णसेवा बजावतात. खुशबू त्यांना भेटण्यासाठी लंडनला निघाली होती. ही तिची पतीसोबतची पहिली भेट होती, कारण विवाहानंतर लगेच मयूर लंडनला रवाना झाले होते. त्यामुळे खुशबूच..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121