मुंबई : बॉलिवूडचा अभिनेता सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून पुन्हा धमकीचा मेसेज पाठवण्यात आला असल्याची धक्कादायक घटना आहे. संबंधीत मेसेजमध्ये त्याला बिश्नोई मंदिरात जाऊन माफी मागावी किंवा ५ कोटी रुपये द्यावे असे मेसेजमध्ये नमूद करण्यात आले. मात्र आता मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या मेसेजच्या मागे नेमके कोण आहे याबाबतची माहिती लवकरच समोर येईल असे सांगण्यात येईल.
लॉरेन्स बिश्नोई यांच्या नावाने एक मेसेज काही तासांपासून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. त्या मेसेजमध्ये लिहिले आहे, यामागे लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ असल्याची माहिती देण्यात आली. जर सलमान खानला जिवंत राहायचे असल्यास त्याने आमच्या मंदिरात जाऊन माफी मागावी किंवा ५ कोटी रुपये द्यावेत. जर त्याने असे केले नाही तर आम्ही त्याला जीवे मारू. आमची टोळी अजूनही याप्रकरणात सक्रिय आहे.
दरम्यान नुकतेच सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळी या नावाने धमकावून तब्बल ५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र, नंतर जमशेदपूर येथून अटक केली असता आरोपीचे नाव शेख हुसैन असल्याचे उघड झाले. त्याने बिश्नोई टोळीचे नाव सांगून ५ कोटी रुपये मागितले होते.