दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा पुनर्विकासाला गती समूह पुनर्विकास प्रकल्पासाठी म्हाडातर्फे निविदा प्रसिद्ध

Total Views | 8

मुंबई, दक्षिण मुंबईतील प्राचीन व ऐतिहासिक महत्व लाभलेल्या कामाठीपुरा क्षेत्राच्या समूह पुनर्विकासासाठी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत समूह पुनर्विकास प्रकल्प राबविण्यात येणार असून, त्यासाठी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी नियुक्त करण्यासाठी निविदा गुरुवार,दि.१२ रोजी जाहीर करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी कामाठीपुरा समूह पुनर्विकास प्रकल्प राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार असून दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा क्षेत्रातील गल्ली क्रमांक १ ते १५ या भागातील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त व बिगर उपकरप्राप्त इमारतींचा व भूखंडांचा एकत्रितरित्या समूह पुनर्विकास हा विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०३४, विनियम ३३ (९) अंतर्गत म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत केला जाणार आहे.

दक्षिण मुंबईतील अत्यंत महत्वाच्या ३४ एकर जागेवर वसलेल्या कामाठीपुरा क्षेत्रातील गल्ली क्रमांक १ ते १५ या गल्ल्यांमध्ये सुमारे ९४३ उपकरप्राप्त इमारती असून यामध्ये सुमारे ६६२५ निवासी व १३७६ अनिवासी असे एकूण ८००१ भाडेकरू / रहिवासी वास्तव्यास असून ८०० जमीन मालक आहेत. या क्षेत्रातील इमारती १०० वर्षे जुन्या आहेत. तसेच संपूर्ण भागातील भूखंडाचे निव्वळ क्षेत्रफळ सुमारे ७३,१४४.८४ चौरस मीटर आहे. या क्षेत्रातील इमारतींचे भूखंड हे अत्यंत छोट्या आकाराचे व अरुंद असल्यामुळे समूह पुनर्विकास हा शास्वत पर्याय ठरतो. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या ८००१ भाडेकरू/रहिवाशांना यांना हक्काचे कायम स्वरूपी घर प्राप्त होणार आहे.

कामाठीपुरा क्षेत्रातील इमारतींचा एकत्रितरित्या समूह पुनर्विकास आराखड्यासाठी म्हाडाने निविदा मागवून मेसर्स माहिमतुरा कन्स्लटेन्ट यांची नियुक्ती केली. या प्रकल्पाचा आराखडा ‘कामाठीपुरा पुनर्वसन प्रकल्प-अर्बन व्हिलेज’ या नावाने तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून रहिवाशांना मोठ्या व सुरक्षित सदनिका, नियोजनबद्ध पायाभूत सुविधांचे नियोजन करण्यात येणार आहे. यामध्ये वाणिज्यिक इमारत, मनोरंजनाचे मैदान सारख्या सुविधांचा देखील समावेश असणार आहे. तसेच या प्रकल्पाच्या माध्यमातून म्हाडास ४४००० चौ. मी. क्षेत्र निविदाधारकांमार्फत उपलब्ध होणार असल्याने मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हाडास मोठ्या प्रमाणात गृहासाठा उपलब्ध होणार आहे. तसेच विकासकास ५६७००० चौ. मी. क्षेत्र उपलब्ध होणार असून अंदाजे ४५०० सदनिका उपलब्धा होणार आहेत.

कामाठीपुरा क्षेत्रातील जमिन मालकांना ५० चौ.मी क्षेत्रफळाच्या भूखंडाकरिता ५०० चौ. फुट क्षेत्रफळाची ०१ सदनिका, ५१ चौ.मी. ते १०० चौ.मी. क्षेत्रफळाच्या भुखंडाकरिता ५०० चौ. फुट क्षेत्रफळाची ०२ सदनिका, १०१ चौ.मी. ते १५० चौ. मी. क्षेत्रफळाच्या भुखंडाकरिता ५०० चौ. फुट क्षेत्रफळाची ०३ सदनिका, १५१ चौ.मी. ते २०० चौ.मी. क्षेत्रफळाच्या भुखंडाकरिता ५०० चौ. फूट क्षेत्रफळाची ०४ सदनिका, २०० चौ. मी. क्षेत्रफळाच्या भूखंडाच्या पुढील प्रत्येक ५० चौ.मी. भुखंड क्षेत्रफळाकरिता ५०० चौ. फुट क्षेत्रफळाची १ अतिरिक्त सदनिका जमीन मालकांना दिली जाणार आहे.

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
२५ जून : आणीबाणीच्या काळ्या आठवणी जागविण्याचा दिवस

२५ जून : आणीबाणीच्या काळ्या आठवणी जागविण्याचा दिवस

आज आपण सर्वजण स्वातंत्र्याचा अनुभव घेतोय. कोणीही, कधीही, कुठेही जाऊ शकतो, मनासारखे (झेपेल त्याप्रमाणे) काहीही करू शकतो. मग विषय कोणताही असो. ‘कोरोना’चा असो किंवा चिनी घुसखोरीचा, शेतकर्‍यांच्या प्रश्नांचा विपर्यास करण्याचा, दि. २६ जानेवारी रोजीच्या राजधानीत घातलेल्या धुडगुसाचे निर्लज्ज समर्थन करण्याचा, खलिस्तानचे समर्थन करण्याचा, ‘वॅसिन’च्या प्रश्नावर दिशाभूल करण्याचा, स्वतःच्या अकार्यक्षमतेचे खापर निर्लज्जपणे केंद्र सरकारवर फोडण्याचा, केतकीच्या कवितेवरून तिला चार महिने तुरुंगवारी घडविण्याचा आणि मोदींना ..

पवनार-पत्रादेवी शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग होणारच !

पवनार-पत्रादेवी शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग होणारच !

राज्य सरकारकडून २० हजार ७८७ कोटींची तरतूद १२ जिल्ह्यांना जोडणारा ८०२ किलोमीटरचा महामार्ग नागपूर ते गोवा १८ तासांचा प्रवास ८ तासांत महाराष्ट्रात धार्मिक यात्रा करण्याची थोर परंपरा असून जनसामान्य त्यानिमित्याने मोठ्या प्रमाणात पर्यटन करतो. या पर्यटनामुळे आर्थिक उलाढाल देखील मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे सर्व धार्मिक स्थळांना जोडणारा महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्याच्या पूर्वेकडील वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून पश्चिमेकडील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121