होय, हे हिंदूंसाठी धर्मयुद्धच!

    15-Nov-2024
Total Views | 88

 Hindus
 
मुस्लिमांच्या ‘व्होट जिहाद’ला सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मतांचे धर्मयुद्ध छेडले आहे. मुस्लिमांची एकगठ्ठा मते मिळावीत, यासाठी ‘उलेमा’च्या १७ मागण्या मविआच्या नेत्यांनी मान्य केल्या आहेत. बहुसंख्या हिंदूंना जातीपातीत विभागून मुस्लिमांची एकगठ्ठा मते मिळवण्यासाठीचे हे षड्यंत्र म्हणूनच हाणून पाडण्याची गरज तीव्र झाली आहे.
 
लोकसभा निवडणुकीत ‘व्होट जिहाद’ झाल्यामुळेच भाजपला महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये मुस्लीमबहुल मतदारसंघातील ७८ जागांवर पराभवाला सामोरे जावे लागले. देशभरातच भाजपविरोधात मतदान करण्याचा फतवा निघाला. म्हणूनच, इंदौर येथे काँग्रेसी उमेदवाराचा अर्ज फेटाळला गेल्याने, तेथील तब्बल दोन लाख मुस्लीम मते ‘नोटा’ला मिळाली, अशी चर्चा तेव्हा रंगली होती. ही सारी घटना पुन्हा नमूद करण्याचे कारण म्हणजे, महाराष्ट्रात ‘व्होट जिहाद’साठी ‘हवाला’मार्गे १२५ कोटी रुपये पाठवल्याचे नुकतेच धडकलेले वृत्त. ‘ईडी’ने मालेगाव येथील एका व्यावसायिकावर केलेल्या कारवाईमुळे हा धक्कादायक प्रकार उजेडात आला. केंद्रीय तपास यंत्रणेने २३हून अधिक ठिकाणी शोधमोहीम राबविली. यात १०० कोटींहून अधिक रुपयांचे व्यवहार बेनामी खात्यातून झाले असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांसाठीचा प्रचार ऐन शिगेला पोहोचला असताना, ‘व्होट जिहाद’ पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहे.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात केलेली टिप्पणी एआयएमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांना अर्थातच झोंबली आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात १३ तारखेला एक पत्रक प्रसिद्धीला दिले होते. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, ओडिशा, गुजरात आणि पश्चिम बंगाल येथून १२५ कोटी रुपये ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात पाठवले गेले. १७५ बँक खात्यांमध्ये ही रक्कम जमा केली गेली आणि ‘हवाला’मार्फत ती लगेच काढून घेण्यात आली. एकूण २ हजार, ५०० व्यवहार त्यासाठी करण्यात आले. महाराष्ट्रात या सर्व १२५ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले, अशी प्राथमिक माहिती आहे. एकीकडे ‘व्होट जिहाद’वरून राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत असताना, केंद्रीय यंत्रणांनी छापेमारी करत केलेली कारवाई, ‘व्होट जिहाद’वर शिक्कामोर्तब करणारीच. ही बँक खाती उघडण्यासाठी बनावट कागदपत्रे तसेच बनावट केवायसीचा वापर केला, अशीही माहिती आहे. आतापर्यंत दोघांना याप्रकरणी अटक करण्यात आली असून, मुस्लीम मते मिळवण्यासाठी या पैशांचा वापर केला गेला, असा आरोप आहे. भाजपने यालाच ‘व्होट जिहाद’ असे संबोधले आहे. ‘उलेमा’ बोर्डानेही महाराष्ट्रात महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. अर्थातच, त्यासाठी त्यांनी ज्या मागण्या केल्या आहेत, त्या वादग्रस्त अशाच आहेत. ‘वक्फ बोर्डा’साठी एक हजार कोटी रुपये, पोलीस भरतीत मुस्लिमांना दहा टक्के आरक्षण गेल्या १२ वर्षांत मुस्लिमांवर जे गुन्हे दाखल झाले, ते मागे घ्यावेत या त्यातील प्रमुख मागण्या. उद्धव ठाकरे तसेच शरद पवार यांनी या मागण्यांना मान्यता दिल्याचे म्हटले जाते.
 
लोकसभेत मुस्लीम मतांचे जे ध्रुवीकरण झाले, त्याचाच भाजपला थेट फटका बसला. त्यापूर्वी कर्नाटक विधानसभेतही असाच प्रकार घडला होता. तेथे भाजपला 65 जागांवर निसटता पराभव पत्करावा लागला. कर्नाटकात काँग्रेसने मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतांसाठी त्यांचे लांगूलचालन केले होते. कर्नाटकात ‘व्होट जिहाद’ यशस्वी झाल्यामुळेच त्याची देशभरात अंमलबजावणी केली गेली, असे नक्कीच म्हणता येते. त्यातूनच ‘एक हैं तो सेफ हैं’ हा नारा महायुतीकडून दिला गेला. ‘बटेंगे तो कटेंगे’ हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेला इशारा निवडणुकीपूर्वी चर्चेत आला. मात्र, महायुतीतील बंडखोरांचे बंड शांत करण्यासाठी तो प्रभावी ठरला. देवेंद्र फडणवीस यांनी त्याचा पुनरुच्चार केला इतकेच. एकगठ्ठा मुस्लीम मते विरोधात जातीपातीत विभागलेली हिंदू मते असा हा विषम सामना होता. महाराष्ट्रात म्हणूनच आरक्षण आंदोलन राजकीय हेतूने हाती घेण्यात आले, असा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि शरद पवार यांच्यावर झाला. प्रत्येक मतदारसंघात मराठा मतदार देण्याची केलेली घोषणा जरांगे यांनी ऐनवेळी मागे घेतली, हे फक्त संदर्भासाठी!
 
काँग्रेसने धर्मनिरपेक्षता याचा चुकीचा अर्थ सांगत अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणाचेच काम गेली कित्येक वर्षे केले असून, आजही काँग्रेसचे हेच धोरण कायम आहे. म्हणूनच, कर्नाटकात याच अल्पसंख्याकांच्या जोरावर ती सत्तेत आली, हे वास्तव. ‘भारत जोडो’च्या माध्यमातून काँग्रेसने देशभरात ‘भारत तोडण्याचे’च पातक केले. बहुसंख्य हिंदू समाजाला जातीपातीत विभागण्यासाठीच काँग्रेसी युवराज राहुल यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी केली. ती मागणी आजही कायम आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीला चोख प्रत्युत्तर देण्यासाठीच भाजपने ‘एक हैं तो सेफ हैं’ असे जाहीरपणे सांगण्यास सुरुवात केली. काँग्रेसने एकीकडे देशाला तोडण्याचे काम केले, तर भाजप पुन्हा देशाला एक करण्यासाठी अव्याहत प्रयत्न करत आहे. ओवेसी आज ‘व्होट जिहाद’ नाकारत असले, तरी मशिदींमधून भाजपविरोधात मतदान करण्यासाठी, काँग्रेसला एकगठ्ठा मतदान करण्यासाठी फतवा निघाला, हे लक्षात घेतले पाहिजे.
 
देवेंद्र फडणवीस यांनी ‘व्होट जिहाद’वर नेमकेपणाने बोट ठेवले आहे. काँग्रेसची हीच धर्मनिरपेक्षता का, अशी विचारणा त्यांनी केली आहे, ती योग्य अशीच. त्यांनी हे धर्मयुद्ध आहे, असे जे म्हटले आहे, ती वस्तुस्थिती आहे. हिंदूंना जातीपातीत विभागून, मुस्लिमांची एकगठ्ठा मते घेण्यासाठी त्यांचे तळवे चाटण्याचे काम काँग्रेस करते, हे पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही. ‘व्होट जिहाद’ला उत्तर देण्यासाठीच फडणवीस यांनी धर्मयुद्धाची घोषणा केली आहे. मतांचे धर्मयुद्ध करण्याची आवश्यकता त्यांनी विशद केली आहे. मतांच्या लाचारीसाठी महाविकास आघाडीचे घटक पक्ष आणि ठाकरे आणि पवार कंपनी मुस्लिमांच्या कोणत्याही मागण्या मान्य करणार असेल, तर हिंदूंना मतांचे धर्मयुद्ध हे करावेच लागेल. फडणवीस यांनी त्याचा उच्चार केला.
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121