धर्मांतर कटापासून ते परकीय षडयंत्र, लव्ह जिहादवर न्यायालयाची टिप्पणी
03-Oct-2024
Total Views | 59
बरेली : आनंद या हिंदू नावाचा वापर करत कट्टरपंथी आलिमने एका हिंदू युवतीसोबत लव्ह जिहाद (Love Jihad) केल्याने त्याला न्यायालयाने त्याला जन्ठेपेची शिक्षा दिली आहे. तसेच त्याचे वडील साबीरलाही न्यायालयाने आपल्या मुलाच्या कटात सामील झाल्याने दोन वर्षांची शिक्षा देण्यात आली आहे. हे प्रकरण लव्ह जिहादचे असून बरेली येथील आहे. याप्रकरणात लव्ह जिहादची खरी व्याख्या न्यायालयाने सांगितली आहे. देशात सुरू असलेल्या धर्मांतराच्या कटापासून ते परकीय षडयंत्र प्रत्येक गोष्टीवर न्यायालयाने अनेक महत्त्वपूर्ण टिप्पणी केली.
न्यायालयाने खटला ऐकल्यानंतर आणि सर्व सक्षीदांचा युक्तीवाद मान्य केल्यानंतर हे स्पष्ट झाले की, मोहम्मद आलिमचे प्रकरण हे लव्ह जिहादच्या माध्यमातून अवैध धर्मांतराचे प्रकरण आहे. यानंतर लव्ह जिहादची व्याख्या देताना न्यायालयाच्या आदेशात असे म्हटले होते.
लव्ह जिहाद प्रकरणात कट्टरपंथी पुरूष महिलांना टार्गेट करतात. ते प्रथम त्यांच्यावर प्रेमाचे नाटक करतात, फसव्या पद्धतीने लग्न करतात, नंतर त्यांच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणतात, हेच काम मोहम्मद आलिमने काम केले आहे. याप्रकरणी आता कोर्टाने लव्ह जिहादची व्याख्या सांगितली आहे.
न्यायालयाने सांगितली लव्ह जिहादची व्याख्या
कोर्टाने लव्ह जिहादबाबत सांगितले की, भारताविरूद्ध एक आंतराष्ट्रीय षडयंत्र आहे. ज्यात एका धर्माचे अराजकीयवादी घटक लव्ह जिहादचा वापर करून अवैध पद्धतीने धर्मांतरण करून लोकसंख्या वाढवू इच्छितात.
अर्थातच लव्ह जिहाद म्हणजे मुस्लिम पुरूषांनी गैर-मुस्लिम समुदायातील महिलांचे इस्लाम धर्मात धर्मांतरण करणे. यावेळी त्यांना प्रेमाचे नाटक करून फसवले जाते. बळजबरीने, आमिष दाखवून किंवा खोटे बोलून धर्मांतर करण्याचा अधिकार कोणालाही दिला जाऊ शकत नाही. एखादी व्यक्ती कोणत्याही धर्माची असो, त्याला अवैध धर्मांतराचा अधिकार नाही.
कोर्टाने म्हटले की, बळजबरीने, आमिष दाखवून किंवा खोटे बोलून धर्मांतर करण्याचा अधिकार कोणालाही दिला जाऊ शकत नाही. एखादी व्यक्ती कोणत्याही धर्माची असो, त्याला अवैध धर्मांतराचा अधिकार नाही. जर भारताने हे लव्ह जिहाद प्रकरण वेळीच रोखले नाहीतर येणाऱ्या काळात गंभीर परिणाम भोगावे लागतील. पाकिस्तान आणि बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण करण्यासाठी हिंदू मुलींना प्रेमाचे अमिष दाखवून त्यांचे अवैध धर्मांतरण करण्याचे गुन्हे प्रतिस्पर्धी टोळीकडून मोठ्या प्रमाणात सुरू आहेत, असे न्यालयाने म्हटले आहे.