शिंदेंविरोधात लढणार म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंनी भरला वरळीतून अर्ज

    24-Oct-2024
Total Views | 82
 
Thackeray
 
मुंबई : बुधवारी उबाठा गटाची पहिली यादी जाहीर झाली. यात आदित्य ठाकरेंना पुन्हा एकदा वरळीतून संधी देण्यात आली आहे. मात्र, मागील वर्षी आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ठाण्यातून लढण्याचं आव्हान दिलं होतं. त्याचं आता काय झालं? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे.
 
राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणूकांचे वारे वाहत आहेत. यावेळी ठाकरे कुटुंबातील दोन्ही सुपुत्र निवडणूकीच्या रिंगणात आहेत. राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे माहिममध्ये तर आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभेतून लढणार आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलं आहे.
 
हे वाचलंत का? -  मविआचं जागावाटप संख्येनुसार नाही, तर मेरिटनुसार : विजय वडेट्टीवार
 
परंतू, गेल्या वर्षी आदित्य ठाकरेंनी एका कार्यक्रमात मी ठाण्यातून लढणार आणि जिंकून दाखवणार, असं आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलं होतं. यावर एकनाथ शिंदेंनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. "जेव्हा त्यांचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून मी शिवसेनेत काम करत आहे. त्यामुळे सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांवर मी काय बोलणार?" असे ते म्हणाले होते. मात्र, आता आदित्य ठाकरेंना वरळीतून तिकीट मिळालं आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे शिंदेंविरोधात लढणार होते त्याचं काय झालं? असा सवाल करण्यात येत आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्‍या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121