बहराइच तणावग्रस्त परिसरात योगीबाबाचा बुलडोजर पॅटर्न
अवैध अतिक्रमण लवकरच हटवणार
18-Oct-2024
Total Views | 191
बहराइच : उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यात महाराजगंज येथे हिंसाचाराची घटना घडली होती. आता त्याच ठिकाणी बुलडोजरची कारवाई केली जाऊ शकते. प्रासरामाध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, प्रशासनासने बेकायदा बांधकामांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. दुसऱ्या वृत्तानुसार दुर्गा विसर्जन मिरवणुकीवेळी हल्ला केला होता. त्यावेळी दगडफेक, विटा आणि काचेच्या बाटल्या फेकण्यात आल्या. या हिंसाचारात १३ ऑक्टोबर रोजी राम गोपाल मिश्राची हत्या करण्यात आली होती.
बहरइच हिंसाचारानंतर योगी सरकार आता मोठ्या कारवाई करण्याच्या तयारीत आहे. बहरइचमधील महाराजगंज शहरातील अवैध अतिक्रमणांवर बुलडोजर चालवण्यात येईल अशी शक्यता आहे. गुरुवारी महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पथकाने या अतिक्रमणावर शिक्कामोर्तब केला आहे. मुख्य आरोपींसह ३०-४० घरे पाडली जाण्याची शक्यता आहे.
महाराजगंज शहरात अनेक दुकानदारांनी रस्त्याच्या ठिकाणी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रस्ते अरूंद झाले आहेत. या अतिक्रमणामुळे मिरवणुकीत गर्दी आणि संघर्षाची परिस्थिती निर्माण झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या गोंधळामुळे मोठा वाद निर्माण झाला होता ज्यात राम गोपाल मिश्रावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ग्रामस्थांच्या तक्रारीवरून काही काळापूर्वी महशी येथील असलेल्या विविध गावांमध्ये अवैध अतिक्रमणाविरोधात मोहिम राबविण्यात आली. मात्र आता दुर्गामातेच्या मूर्ती विसर्जनावेळी झालेल्या हिंसाचारात ही मोहिम सुरू होण्याची शक्यता आहे.
याप्रकरणात प्रसारमाध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या खून प्रकरणातील मुख्य आरोपीविरोधात वेगाने कारवाई सुरू केली. यावेळी मोहम्मद सरफराज आणि मोहम्मग तालिब या दोन मुख्य आरोपींसोबत पोलिसांची चकमक झाली. बहराइच येथील नानपारा येथे चकमक झाली, ज्या ठिकाणी पोलिसांनी आरोपींना घेरले गेले होते, तेव्हा पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन्ही आरोपी जखमी झाले. नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात हे आऱोपी पकडले गेले आहेत.