अर्थशक्तीत भारतच सरस; चीनची स्थिती चिंताजनक

संयुक्त राष्ट्र संघाचा अहवाल

    06-Jan-2024
Total Views | 81
Indian Economy Becomes Fastest Growing Economy

न्यूयॉर्क :
भारतविरोधी सातत्याने कुरघोडी करणार्‍या चीनची अर्थव्यवस्था चिंताजनक स्थितीत असून भारताची अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत असल्याचे शिक्कामोर्तब संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक आर्थिक परिस्थिती आणि संभावना (डब्ल्युईएसपी) २०२४ च्या अहवालात करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मते, उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील चांगली देशांतर्गत मागणीमुळे भारताचा विकास दर २०२४ मध्ये ६.२ टक्के असेल, असा अंदाज आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचे महत्त्वपूर्ण योगदान असेल, असेही अधोरेखित करण्यात आले आहे.

जागतिक आर्थिक परिस्थिती आणि संभावना या अहवालातम्हटले आहे की, दक्षिण आशियाचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) २०२४ मध्ये ५.२ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे, तर भारताचा विकास दर २०२४ मध्ये ६.२ टक्के असेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

दक्षिण आशियाचे सकल देशांतर्गत उत्पादन अर्थात ‘जीडीपी’ २०२४ मध्ये ५.२ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. भारताला प्रोत्साहित करणार्‍या या अहवालात देशाची कामगिरी उत्पादन आणि सेवा क्षेत्रात उत्तम असणार आहे. देशांतर्गत मागणी आणि विकास दर कायम राहील, असेही अहवालात नमूद केले आहे. मात्र, २०२३ च्या तुलनेत त्यात किरकोळ घट अपेक्षित असल्यााच अंदाजही आहे. या अहवालानुसार, २०२५ मध्ये भारताचा ‘जीडीपी’६.६ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक आर्थिक देखरेख विभागाचे प्रमुख हमीद रशीद म्हणाले की, “भारतीय अर्थव्यवस्थेने या वर्षीच नव्हे, तर गेल्या काही वर्षांपासून इतर अर्थव्यवस्थांच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. भारताचा आर्थिक विकास दर सातत्याने सहा टक्क्यांच्या वर राहिला आहे,” असेही हमीद रशीद यांनी म्हटले आहे. भारताचा विकासाचा दर २०२४ आणि २०२५ मध्येही तो कायम राहील. भारतात महागाई जास्त आहे, तरीही भारताला व्याजदर जास्त वाढवण्याची गरज नसल्याचेही हमीद रशीद यांनी म्हटले आहे.

चीनबद्दल चिंता व्यक्त केली

संयुक्त राष्ट्र संघाच्या या अहवालात चीनच्या आर्थिक स्थितीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये गुंतवणूक अधिक झाली असल्याचे यात नमूद करण्यात आले असून २०२३ मध्ये दक्षिण आशियातील, विशेषत: भारतातील गुंतवणूक वाढली आहे. चीनमधील गुंतवणुकीला बांधकाम क्षेत्रातून मोठा फटका बसल्याने चीनच्या अर्थव्यवस्थेवर संकट ओढवले असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

हवामान बदलाचा फटका

जागतिक हवामान बदलाचा परिणाम जगातील सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थांवर होत आहे. हवामान-बदलामुळे दक्षिण आशियाला मोठी आर्थिक हानी पोहोचण्याचा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. सरासरीपेक्षा जास्त पावसामुळे पाकिस्तानात निर्माण होणारे संकट. भारत, नेपाळ आणि बांगलादेशच्या बहुतेक भागांना जुलै आणि ऑगस्टपर्यंत वाढलेला दुष्काळ, प्रभावित करतो, त्याचा ‘जीडीपी’मध्ये सर्वांत मोठा वाटा असलेल्या देशांमध्ये सर्वात गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे, असेही या अहवालात म्हटले आहे.

चिनी प्रसारमाध्यमांकडूनही कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या आर्थिक आणि परराष्ट्र धोरणात सकारात्मक बदल झाल्याचे चीनचे सरकारी माध्यम ‘ग्लोबल टाइम्स’ने म्हटले आहे. त्यासोबतच देश मोदींच्या नेतृत्वात वेगाने प्रगती करत आहे. चिनी प्रसारमाध्यमांनी उघडपणे भारताची स्तुती केली आहे आणि एक शक्तिशाली देश असल्याचे वर्णन केले आहे. त्यापाठोपाठ संयुक्त राष्ट्र संघाच्या अहवालातही भारताच्या आर्थिक धोरणांचे कौतुक करण्यात आले आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
मुंबई लोकल अपघात : मृतांचा आकडा ८ वर; वाचा दिवसभरात काय घडलं?

मुंबई लोकल अपघात : मृतांचा आकडा ८ वर; वाचा दिवसभरात काय घडलं?

आठवड्याचा पहिलाच दिवस मध्य रेल्वेसाठी काळा दिवस ठरला आहे. कसारा-सीएसएमटी लोकल मार्गावरून प्रवास करणाऱ्या ८ जणांचा सोमवार दि.९ रोजी रुळावर पडून मृत्यू झाला आहे. कसाऱ्याकडून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधून नऊ ते दहा प्रवासी खाली पडले आणि त्यापैकी आठ जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवार, दि. ९ रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. "सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास या घटनेची माहिती मिळाली होती. मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान ही घडली. फूटबोर्डवर उभ्या असलेल्या या प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागला आणि ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121