देवरांनंतर काँग्रेसला आणखी एक धक्का! 'या' मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
14-Jan-2024
Total Views | 820
गुवाहाटी : महाराष्ट्रात काँग्रेसचे दिग्गज नेते असलेल्या मिलिंद देवरा यांनी राजीनामा दिल्यानंतर आता आसाममधील अपूर्वा भट्टाचार्य यांनी सुद्धा काँग्रेसला सोडचिट्टी दिली आहे. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा सुरू होण्यापूर्वी रविवारी काँग्रेसला हा दुहेरी झटका बसला आहे. अपूर्वा भट्टाचार्य हे आसामध्ये काँग्रेसचे आसाममध्ये सचिव होते.
राहुल गांधींच्या यात्रेपूर्वी या दोन्ही नेत्यांचा राजीनामा पक्षासाठी मोठे नुकसान मानले जात आहे. आसाममध्ये काँग्रेसला आधीपासूनच घरघर लागली आहे. आसामध्ये काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांनी पक्षला सोडचिट्टी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मिलिंद देवरा यांनी दि. १३ जानेवारी २०२४ ला काँग्रेस पक्षातून राजीनामा दिला होता. त्यांनी आजच शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यातच आता अपूर्वा भट्टाचार्य यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला दुहेरी धक्का बसला आहे. अपूर्वा भट्टाचार्य यांचे भविष्यातील राजकीय पाऊल काय असेल? याबाबत खुलासा झालेला नाही.