रामानुजन पुण्यतिथीच्या निमित्ताने ज्योतिर्गणित-ज्योतिषशास्त्राची परंपरा

    25-Apr-2023
Total Views | 172
 
Ramanujan
 
 
थोर भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन यांची आज पुण्यतिथी. रामानुजन आणि त्यांचे गणिताचे वेड, त्यांनी मांडलेले गणितीय सिद्धांत हे अगदी सुविख्यात. पण, रामानुजन यांच्यासारखेच गणितशास्त्र, खगोलविज्ञान, ज्योतिषशास्त्र यांसारख्या भारतीय शास्त्रांमध्ये महनीय व्यक्तींनी दिलेले योगदान हे कायमच जागतिक पातळीवर मात्र उपेक्षित राहिले. तेव्हा,आज रामानुजन यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने प्राचीन भारतीय ज्योतिर्गणित-ज्योतिषशास्त्राच्या परंपरेचा आढावा घेणारा हा लेख...
  
विश्वाचे गहन कोडे, त्याचे अंतरंग, त्याचा आदी-अंत, व्यवस्था, भवितव्य, त्यात मानवाचे स्थान, त्याच्या अनेक समस्या, त्यांची उत्तरे या विषयींची जिज्ञासा मानवाला प्राचीन काळापासून आहे. पौर्वात्यांना तसेच पाश्चात्यांनाही... आणि ती जिज्ञासा पुरी करण्याचे प्रयत्न दोन्हीकडे झाले होते व आजही चालू आहेत. या जिज्ञासेच्या पोटी विज्ञानांचा, शास्त्रांचा व तत्त्वज्ञानाचा उगम झाला. ही जिज्ञासा पुरी करण्याचे म्हणजे ज्ञानाचा शोध घेण्याचे पौर्वात्यांचे, विशेषतः भारतीयांचे मार्ग व साधने आणि पाश्चात्यांचे मार्ग व साधने ही ऐतिहासिक कालांत सारखीच नव्हती. भारतीयांनी आपले ज्ञान अंतःप्रतिभेच्या आधारावर (इन्ट्यूटिव्ह बेसिस-अंतर्ज्ञान) उभारले. त्यांनी तार्किक अनुमानाचा (डीडक्टिव्ह रिझनिंग) चा फार थोडा वापर केला. पुरावे, ताळे, तर्कमालिका वगैरेंचा अवलंब न करता, त्यांनी एकदम मुख्य सिद्धांताचाच शोध लावला. पाश्चात्यांनी (ग्रीकांनी) भूमितीचे व विज्ञानाच्या इतर शाखांचे ज्ञान मिळवण्याकरिता प्रामुख्याने तर्कबुद्धीचा उपयोग केला. मात्र, प्रत्यक्षात भारतीय वैज्ञानिक केवळ अंतःप्रज्ञावादी व ग्रीक पाश्चात्य वैज्ञानिक केवळ तर्कप्रज्ञावादी होते, असे मुळीच नाही. पण, भारतीयांनी अंतःप्रज्ञेवर अधिक भर दिला, तर पाश्चात्यांनी तर्कप्रज्ञेवर अधिक भर दिला, असे म्हणता येईल.
 
गणित, विज्ञान अथवा गणितशास्त्रे ही सर्व विज्ञानांचे अथवा शास्त्रांचे मूळ आधार असे मानतात. स्थूलपणे गणितविज्ञानाच्या शाखा, अंकगणित, बीजगणित, भूमिती, त्रिकोणमिती (ट्रिग्नॉमेट्री) अशा मानतात. खगोलशास्त्र अथवा ज्योतिर्गणित (अस्ट्रॉनॉमी) ही एक गणिताची प्रचंड क्षेत्र असलेली शाखा मानावी. यापैकी भारतात भूमिती अथवा रेखागणित व खगोलशास्त्र (ज्योतिष) सर्वांत प्रथम जन्माला आली.
 
1 पासून 9 पर्यंतचे आकडे व 0 ही दहा अंकचिन्हे आतापर्यंत झालेल्या व पुढे होणार्‍या सर्व शास्त्रीय, तांत्रिक व इतर मानवी प्रगतीचा पाया व भक्कम मूलभूत साधन झाले आहे. यांना भारतीयांनी दोन-अडीच हजार वर्षे किंवा त्याहीपूर्वी विचार व कल्पनाशक्तीच्या बळावर जन्म दिला. त्यांची गरज व उपयुक्तता विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीला अधिकाधिक वाढतच चाललेली आहे. भारताशिवाय इतर काही देशांनीही आपापल्या परीने निरनिराळ्या अंक पद्धती शोधून काढल्या. पण, त्या सगळ्या क्लिष्ट, बोजड, गोंधळ निर्माण करणार्‍या होत्या, म्हणून नामशेष झाल्या. भारतीय अंकनपद्धती नसती, तर जगात विज्ञानाची व तंत्रज्ञानाची जी प्रगती झालेली आहे ती कधीच झाली नसती.
 
भारतात रेखागणित (भूमिती, जिओमेट्री) या शास्त्राचे मूळ मुमुक्षेच्या पोटी आहे, ही एक विशेष लक्षात घेण्याजोगी गोष्ट आहे. या शास्त्रांचा उद्गम व विकास दुसर्‍या कोणत्याही ऐहिक कार्यसिद्धीकरिता नसून पारमार्थिक, अक्षय व अविनाशी मानल्या गेलेल्या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी होता. अशाच प्रकारे रसायन शास्त्राचा उद्गम व विकास, इतर देशांत धनवर्धनासाठी झाला, तसा न होता लोककल्याणासाठी झाला. देवता प्रसन्न करण्यासाठी यज्ञ ही संस्था उत्पन्न झाली. यज्ञाकरिता अवश्य असणार्‍या वेदीची उभारणी व आकार हे निर्दोष तयार करण्याकरिता ज्या पद्धती हळूहळू उत्पन्न होत गेल्या, त्यातून रेखागणित हे शास्त्र तयार झाले. या मोजमापाच्या शास्त्राला ’शुल्वशास्त्र’ अथवा ’शुल्बशास्त्र’ असे म्हणत. रज्जुने (दोर्‍याने) माप घेण्याचे हे शास्त्र ज्यात ग्रथित केले आहे, त्या ग्रंथास ’शुल्वसूत्रे’ असे नाव दिले आहे. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेदव अथर्ववेद या चार वेदांपैकी ’यजुर्वेद’ हा यज्ञांच्या कृतीसंबंधी आहे. यजुर्वेदाच्या कल्पसूत्रांचा ’शुल्वसूत्रें’ हा एक भाग आहे.
 
शुल्वसूत्रांचा काळ नवव्या ते आठव्या इसवी सन पूर्व शतकांतील आहे, असे वैज्ञानिक मानतात. ती व्यवस्थित सूत्रांत ग्रंथरचित होण्यापूर्वी भारतीय गुरुशिष्य परंपरेप्रमाणे अलिखित स्वरूपात जाणकारांच्या मुखांत बराच काळ असली पाहिजेत. शुल्वसूत्रांत मधूनमधून प्रमेय अथवा सिद्धांत मांडल्यानंतर ’इति अभ्युपदिश्यन्ति’ (असे अधिकारवाणीने सांगितलेले आहे), ’इति विज्ञायते’ (अशी माहिती आहे), ’इत्युक्तम’(असे म्हटले आहे), अशी पुस्ती जोडली आहे. त्यावरूनही असे सिद्ध होते की, शुल्वसूत्रीय सिद्धांत व प्रमेये लिहिली गेली त्याआधीही ज्ञात होती.
 
जगातील अत्यंत महत्त्वाचा भूमितीतला सिद्धांत ’काटकोनाच्या कर्णावरचा चौरस हा इतर दोन बाजूंवरील चौरसांच्या बेरजेएवढा असतो’ हा सिद्धांत ग्रीक तत्वज्ञ-शास्त्रज्ञ पायथागोरस (इ.स.पूर्वी 540) याने प्रथम शोधून काढला, असे मानतात व म्हणून त्याला ’पायथागोरस सिद्धांत’ असे म्हणतात. परंतु, हा सिद्धांत ’बौधायन शुल्वसूत्रांत’ (इ.स.पूर्वी आठवे शतक) आढळतो. इतकेच नव्हे, तर ’बर्क’ यांच्या म्हणण्यानुसार, पायथागोरस याने ’बौधायन सूत्रे’ ग्रथित झाल्यानंतर दोन अडीच शतकांनी हिंदुस्थानला भेट दिली. त्यावेळी त्याला वरील सिद्धांताचे ज्ञान मिळाले, त्यावेळी ब्राह्मण शिक्षकांनी त्याला काही शिक्षण दिले,असा पुरावाही इतिहासलेखक अपुलियस याने दिला आहे. हॉपकिन्स यांनीही इ. स. पूर्व आठव्या शतकाच्या काळी भारतात भूमितीत झालेली प्रगती स्पष्ट दिसते व ती फार मोठी होती, असे पुरावे दिले आहेत.
 
ज्याप्रमाणे रेखागणित अथवा शुल्वशास्त्र अथवा भूमिती हा कल्पसूत्रांचा भाग व कल्पसूत्रे हे वेदांच्या छंदशास्त्र, कल्पसूत्रे, ज्योतिष, निरुक्त, शिक्षा आणि व्याकरण या सहा अंगांपैकी एक अंग आहे, त्याचप्रमाणे ’ज्योतिष’ अथवा ’ज्योतिःशास्त्र’ हेही वेदांच्या षडंगांपैकी एक अंग आहे आणि त्याचा उगमही मनुष्याचे अंतिम पारमार्थिक ध्येय साधण्याच्या आत्यंतिक इच्छेत आहे.
इसवी सन 628 पर्यंत ज्ञात असलेले ज्योतिषशास्त्र ब्रह्मगुप्ताने एकत्र संकलित व संपादित केले. भारतीयांनी गणितशास्त्रात केलेली प्रगती ज्योतिषशास्त्रालाही कोष्टके, तक्ते, पत्रके वगैरे तयार करण्यासाठी उपयोगाची झाली. ब्रह्मगुप्ताने पृथ्वीचा व्यास 5182 मैल आहे, असे गणिताच्या आधारे दाखवून दिले. त्याचा ’ब्रह्मस्फुटसिद्धांत’ हा ज्योतिषशास्त्र व गणितशास्त्र यावरचा ग्रंथ अल-फराबी याने इ.स.711 मध्ये अरबी भाषेत भाषांतर करून बगदादादला नेला व तो स्वतःनंतर अरब देशांतला पहिला ज्योतिषशास्त्रज्ञ म्हणून मान्यता पावला. इस्लामी देशांतील प्रथम श्रेणीतील मानला गेलेला ’अल-ख्वारिझमी’ याने आपली कोष्टके, तक्ते वगैरे ‘अल-फराबी’च्या ग्रंथावर आधारित केले आहेत. नंतर या कोष्टक-तक्त्यांचे लॅटिन भाषांतर बाथच्या ऍडलेड याने इ. स. 1126 मध्ये केले.
युरोपीय ज्योतिषशास्त्रांतील ग्रहमार्गकक्षेच्या (ऑर्बिट) सर्वात उच्च बिंदूला ’ऑक्स’ असा शब्द प्रचलित होता, तो संस्कृत ’उच्च’ या शब्दाचा अपभ्रंश आहे. भारतीयांच्या कल्पनेनुसार, पृथ्वीवर उत्तर-दक्षिण-पूर्व-पश्चिम या चार दिग्बिंदू (कार्डिनल पॉईंट्स) पासून समांतर असलेला शिखरबिंदू हा विक्रमादित्याची राजधानी उज्ययिनी अथवा अवन्ती या ठिकाणी आहे. अवन्तीचे युरोपांत ’अरिन’ असे रूपांतर झाले.
 
भारतीय ज्योतिषशास्त्रज्ञांनी हजारो मैल अंतरावरील ग्रहांच्या गती-स्थिती निरीक्षणासाठी केवळ आपल्या डोळ्यांचा उपयोग केला. त्यामुळे या मर्यादित माहितीचा उपयोग व बाकी बराचसा आपल्या अंतःप्रज्ञेवर भरवसा ठेवून, अंतर्मुख होऊन केलेल्या चिंतनाच्या आधारे आपले सिद्धांत ठरवले. ज्योतिषशास्त्रात निरीक्षण हे माहिती मिळवण्याचे प्रधान साधन आहे. त्याबाबतीत भारतीय शास्त्रज्ञ मागे पडल्याने एकंदर खगोलज्ञानातही ते मागे पडले. असे असूनसुद्धा त्यांच्या काही आजच्या शास्त्रीय निकषांवर अपुर्‍या अथवा चुकीच्याही ठरलेल्या माहितीच्या आधारावर ते आजही करीत असलेल्या ज्योतिषशास्त्रासंबंधी अचूक अंदाज व भाकिते करण्याची क्षमता वाखाणण्याजोगी आहे. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे भारतीय पंचांग.
 
अंकगणितात इतकेच नव्हे, तर अखिल विज्ञानांतील आतापर्यंत लावलेल्या सर्व शोधात, अत्यंत मूलगामी व महत्त्वाचा शोध म्हणजे 1 ते 9 व 0 ही अंकचिन्हे. हा शोध भारतीय आहे. कोणातरी भारतीयाने 1 ते 9 व 0 ही अंकन चिन्हे किती प्राचीन काळी शोधून काढली, त्याविषयी कोणताही ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही. अरबांनी इ. स. 712 मध्ये सिंध पादाक्रांत केला, त्यावेळी अरब व्यापार्‍यांनी ती भारतातून इतर देशात नेली. ही अंकन पद्धती इतकी कल्पनातीत, सोपी असून सर्व कार्योपयोगी होती की बाकीच्या सर्व अंकन पद्धती नामशेष झाल्या व भारतीय अंकनपद्धती सर्व देशांत अंगीकारली गेली व अद्याप ती वापरात आहे. ती अरबांनी युरोपात व इतर देशात नेल्यामुळे त्या लोकांनी तिला ’अरबी संख्यादर्शक पद्धती’ असे नाव दिले. आता ऐतिहासिक पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे की, ही संख्यादर्शक पद्धती भारतीय आहे. खुद्द अरबांनीच तिला व एकंदर भारतीय अंकगणिताला ’हिंदिसत’, ’हिंदी कला (अथवा विद्या)’ असे नाव दिले होते.
 
‘0’ हे अंकनचिन्ह इ.स.पूर्व 1500 पूर्वीच्या वैदिक संहितांत उल्लेखिलेले आहे. मूळ संस्कृत ग्रंथामध्ये शून्याचा उपयोग अध्यात्मिक अर्थाच्या संदर्भात आला आहे. शून्य म्हणजे अनस्तित्व, काही नाही. त्याचप्रमाणे शून्य म्हणजे अनंत, सर्वव्यापी. त्याचा खरा अर्थ ते ज्या संदर्भात वापरले जाते त्यावरून ठरवायचा. त्याची व्याप्ती अनस्तित्वापासून अनंतापर्यंत आहे. पण, आध्यात्मिकदृष्ट्या ते अनस्तित्वदर्शक म्हणून निराकार व अनंत म्हणूनही निराकार. दोन्हीही टोके मानवाच्या बुद्धीच्या आकलन शक्तीच्या पलीकडची आणि हाच आध्यात्मिक अर्थ बरोबर व्यवहारी आकडेशास्त्रातही आणला आहे. ही गोष्ट अत्यंत अजब आहे. शून्याला मूळची किंमतच नाही आणि आहेही.
 
पहिला आर्यभट (इ.स.476), महावीर (इ.स.850), पहिला श्रीधर (इ.स.900), दुसरा आर्यभट (इ.स.950), दुसरा भास्कर (इ.स.1114-1200), नारायण (इ.स.1356) या गणितज्ज्ञांनी अंकगणित संबंधात मौलिक भर घातली आहे. पण, इतर अनेक गणितज्ज्ञांनीही काही मौलिक कार्य केले आहे. जवळ जवळ सर्वच प्राचीन विज्ञानोपासक अंतःप्रज्ञेवर अवलंबून होते. आईन्स्टाईनसारख्या अनेक विख्यात आधुनिक शास्त्रज्ञांनी अनेक सिद्धांत अंतःप्रतिभेच्या बळावर शोधून काढले आहेत. अंतःप्रज्ञेला प्रातिभि, अंतर्दृष्टी, ध्यानयोग, अंतर्ज्ञान, साक्षात्कार वगैरे नावे दिलेली आढळतात. तसेच जगद्गुरू शंकराचार्य स्वामी भारती कृष्ण तीर्थजी महाराज (1884-1960) यांचा ग्रंथ ’वेदिक मॅथेमॅटिक्स’ या नावाने प्रसिद्ध झाला. आज हे ’वेदिक मॅथेमॅटिक्स’ इंग्लंडमधल्या शाळेमध्ये शिकवले जाते.
 
भारतातले अत्यंत लक्षवेधी उदाहरण श्रीनिवास रामानुजन (1887-1920) या प्रसिद्ध गणित शास्त्रज्ञाचे आहे. लहानपणापासून हा शांत, ध्यानचिंतनात मग्न असलेला व आकड्यांची गणिते करण्याची आवड असलेला असा हा गणिततज्ज्ञ. शालेय परीक्षांमध्ये तो नेहमीच नापास होत असे. इंग्रजी भाषा या विषयाकडे तो दुर्लक्ष करीत असे, पण उत्तीर्ण होण्यासाठी ते आवश्यक असे. गरिबीमुळे अभ्यासाची पुस्तके विकत घेणे त्याला शक्य नव्हते. पण, गणितातली प्रमेये व सिद्धांत शिक्षकांच्या अथवा पुस्तकांच्या मदतीशिवाय तो स्वतःच विचार करून शोधून काढत असे. त्याची ही स्वयंप्रतिभा त्याच्या एका शिक्षकाने पत्रव्यवहार करून केम्ब्रिजमधील प्रख्यात गणिती जी. एच. हार्डी यांच्या नजरेस आणून दिली. रामानुजनच्या प्रतिभेने ते इतके प्रभावित झाले की, त्यांनी रामानुजनसाठी एक खास फेलोशिप केम्ब्रिज विश्वविद्यालयात निर्माण करून त्याला तिकडे नेले. रामानुजनचे अमर्याद ज्ञान व ज्ञानाची अगाधता अचंबित करणारी होती. काहीही विश्वविद्यालयीन शिक्षण नसताना, इंग्रजी भाषेचे विशेष ज्ञान नसताना वयाच्या 21व्या वर्षी रामानुजन हा ‘रॉयल सोसायटी ऑफ लंडन’ या विज्ञानशास्त्रात प्रतिष्ठित मानल्या गेलेल्या संस्थेचा पहिला भारतीय ‘फेलो’ म्हणून निवडला गेला.
 
रामानुजन यांच्या प्रचंड प्रज्ञासामर्थ्यांविषयीची नवीन माहिती त्याच्या मृत्यूनंतर 62 वर्षांनी प्रकाशात आली. ती वाचून आजच्या भारतात दिसून येणारी स्वकीय विद्वान, शास्त्रज्ञ, भारतीय शास्त्रे, हिंदू संस्कृती, भारतीय विद्वानांनी अंतःप्रज्ञेने, अंतर्मुखी चिंतन व अंतःप्रतिभेच्या प्रेरणेवर अवलंबून संपादन केलेले ज्ञान या बाबतीतील अनास्था व त्यांची उपेक्षा, सरकार दरबारी व विश्वविद्यालयांत अधिकाराच्या पदांवर असणार्‍या भारतीयांचा दृष्टिकोन व त्यांची वृत्ती व त्याचबरोबर तुलनेने आज पाश्चात्य विद्वान शास्त्रज्ञांनी, त्यांच्या देशाबाहेरीलही विद्वान, संस्कृती, शास्त्रे यांच्याविषयी दाखवलेली आस्था व त्यावर शास्त्रीय संशोधन करून निष्कर्ष काढण्यासंबंधीची तीव्र ज्ञानलालसा यावर प्रकाश पडेल व रामानुजनसारखा अद्वितीय प्रज्ञावंत आमचा देशबांधव म्हणून प्रौढी मिरवण्याचा आम्हाला कोणता नैतिक अधिकार आहे, असाही प्रश्न उद्भवेल!
 
(संदर्भ: ’भारतातील शास्त्रांचा उद्गम व विकास-मानस सामाजिक मूलाधार व आज घ्यायचे धडे’ लेखक: जगप्रसिद्ध सामाजिकमानसशास्त्रज्ञ व ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचे तत्वज्ञ डॉ. पंढरीनाथ प्रभू)
सर्वसामान्य मनुष्याला ज्योतिष्यांकडून आपले भविष्य जाणून घेण्यात रस असतो. त्यात काही विपरित आढळल्यास तो ग्रहशांती इत्यादी धार्मिक कृत्ये ज्योतिष्यांच्या सल्ल्याने करतो. मुलांची कुंडली बनवणे, मुंज, लग्नासारखे संस्कार करताना शुभमुहूर्त काढण्यासाठी पंचांग व ज्योतिषाचे साहाय्य घेणे, हे भारतीयांच्या जीवनपद्धतीचा आजही एक भाग आहे.
 
डॉ. पंढरीनाथ प्रभू या आधुनिक शिक्षणमहर्षींच्या या ग्रंथांतील अभ्यासपूर्ण विवेचनाची दाखल घेऊन, भारतातल्या आजच्या सरकार व शिक्षणतज्ज्ञांनी व इतर हितसंबंधीयांनी, आपापल्या राजकीय विचारधारा बाजूला ठेवून, आजच्या केवळ परीक्षेसाठी माहिती देऊन श्रवण-पठण करून घेणार्‍या शिक्षण प्रणालीत आमूलाग्र बदल करून, वेदांत व आधुनिक तंत्रज्ञान यांचा समावेश केलेली, मनन-चिंतन-निदिध्यासन (जे गुरुमुखातून ऐकले त्याच्या अर्थावर निरंतर विचार करणे. ही स्थिती मन एकाग्र केल्यावर प्राप्त होते) यांना स्थान व वाव देऊन, अंतःप्रज्ञेसारखी अंतर्निरीक्षणशक्ती व तर्कबुद्धीसारखी बहिर्निरीक्षण शक्ती यांची वृद्धी करणार्‍या प्राणायाम व ध्यान यांनी युक्त अशी नवी भारतीय शास्त्रांचे व आधुनिक विज्ञानाचे ज्ञानदायी शिक्षण देणारी प्रणाली निर्माण करणे, हे आपले दायित्व आहे हे लक्षात घेऊन ती प्रत्यक्षात आणण्याचा संकल्प करणे, ही आज 26 एप्रिल रामानुजनच्या 103 वर्षीय पुण्यतिथीला दिलेली आदरांजली ठरेल.
 
 
- ज्ञानचंद्र वाघ
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
विजय रुपाणी यांच्या मृतदेहाची ओळख पटली अहमदाबाद विमान दुर्घटना : पार्थिवावर राजकोट येथे अंत्यसंस्कार; ३२ जणांचे डीएनए जुळले

विजय रुपाणी यांच्या मृतदेहाची ओळख पटली अहमदाबाद विमान दुर्घटना : पार्थिवावर राजकोट येथे अंत्यसंस्कार; ३२ जणांचे डीएनए जुळले

अहमदाबादहून लंडनला निघालेल्या विमानाचा दि. १२ जून रोजी भीषण अपघात झाला. या अपघातात २४२ पैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. याच विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही मृत्यू झाला होता. तीन दिवसांनंतर डीएनए चाचणीमुळे त्यांच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. विजय रुपाणींचा डीएनए जुळला असल्याची माहिती रुग्णालयाने रविवार दि. १६ जून रोजी सकाळी ११.१० वाजता दिली. त्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या कुटुंबाकडे दिले. गुजरातचे आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार विजय रुपाणी यांच्या पार्थिवावर राजकोट ..

धर्मांधांनी मंदिराबाहेर फेकले गोमांसाचे तुकडे; मुख्यमंत्र्यांनी दिले

धर्मांधांनी मंदिराबाहेर फेकले गोमांसाचे तुकडे; मुख्यमंत्र्यांनी दिले 'Shoot at Sight'चे आदेश

आसाममध्ये गेल्या अनेक दिवसांपासून इस्लामिक कट्टरपंथी हिंदू मंदिरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. मंदिर परिसरात वारंवार गोमांस फेकून हिंदूंच्या श्रद्धेची खेळण्याचा प्रयत्न होतो आहे. आसामच्या लखीपूर येथील काली मंदिराजवळ गोमांस फेकण्याची घटना घडल्याने परिसरात जातीय तणाव वाढल्याचे पाहायला मिळत आहे. यापूर्वी आसाममधील धुबरीमध्येही असाच काहीसा प्रकार घडला होता. त्यामुळे स्थानिक हिंदूंमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे. मुख्यमंत्री हिमंता बिसवा सरमा यांनी सुद्धा आरोपींना थेट गोळ्या घालण्याचे आदेश दिलेत...

अमेरिकेवर हल्ला केल्यास वाईट परिणाम होतील डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा; इस्रायलकडून तीव्र प्रत्युत्तर

अमेरिकेवर हल्ला केल्यास वाईट परिणाम होतील डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा; इस्रायलकडून तीव्र प्रत्युत्तर

इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला आहे. इस्रायलने केवळ इराणच्या अणू ठिकाणांवर हल्ले केले नाहीत, तर नऊ शास्त्रज्ञांनाही ठार केले आहे, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, "इराणवर झालेल्या ताज्या इस्रायली हल्ल्यांमध्ये अमेरिकेची काहीही भूमिका नव्हती. पण, इराणने अमेरिकेवर हल्ला केला, तर आमचे लष्कर संपूर्ण ताकदीने त्याच्यावर तुटून पडेल. ही कारवाई अशी असेल, जिचा विचार इराणने कधीच केला नसेल.” अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही पोस्ट शेअर केली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121