जावेद यांच्या सडेतोड प्रतिप्रश्नांचे कंगना रनौत कडून कौतुक
21-Feb-2023
Total Views |
34
मुंबई : गीतकार जावेद अख्तर यांनी एका कार्यक्रमासाठी नुकताच पाकिस्तानचा दौरा केला. उर्दू शायर फैज अहमद फैज यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अख्तर लाहोरमध्ये होते. त्यावेळी त्यांना भारताबद्दल अनेक प्रश्न विचारले गेले. भारताची बाजू घेऊन जावेद यांनी यावेळी सडेतोड मुद्दे उपस्थित केले. मुंबईवर हल्ला करणारे दहशतवादी, लता मंगेशकर आणि भारतीय जनता याविषयी चर्चा यावेळी पाकिस्तानात झाली. यावर जावेद यांनी दिलेली उत्तरे ऐकून अभिनेत्री कंगना रनौत हिनेही त्यांचे कौतुक केले आहे.
कार्यक्रमात त्यांना विचारण्यात आलेला प्रश्न असा होता, तुम्ही भारतात जाऊन पाकिस्तानी चांगले लोक असल्याचे सांगाल का? तसेच तुम्ही अनेकदा पाकिस्तानात आला आहात. तुम्ही परत गेल्यावर तुमच्या लोकांना सांगाल का की पाकिस्तानी चांगले लोक आहेत? या प्रश्नाच्या उत्तरात अख्तर म्हणाले, "आपण एकमेकांवर आरोप करू नये. यामुळे कोणताही प्रश्न सुटणार नाही. मुंबईवर हल्ला कसा झाला हे आपण पाहिले आहे. मुंबई हल्ल्याचे सूत्रधार येथे मोकळेपणाने फिरत आहेत. दहशतवादी नॉर्वे किंवा इजिप्तमधून आलेले नाहीत. ते दहशतवादी तुमच्या देशात मुक्तपणे फिरत आहेत. त्याविरोधात भारतीयांनी तक्रार केली आहे. याविषयी मला उत्तर द्यावे लागेल.
तसेच त्यांनी प्रतिप्रश्न केला की, मेहदी हसन आणि नुसरत फतेह अली खान यांना आमंत्रित करून आम्ही भारतात मोठे कार्यक्रम केले आहेत. परंतु लता मंगेशकर याना आमंत्रण देऊन तुम्ही किती कार्यक्रम केलेत? यावर कंगना रणौतने जावेद अख्तर यांच्या वक्तव्याचे कौतुक केले आहे. "जेव्हा मी जावेद साहेबांची कविता ऐकतो, तेव्हा मला वाटायचे की त्यांच्यावर माँ सरस्वतीजींची कशी कृपा आहे, पण बघा, माणसात काही तरी सत्य आहे, तरच खणखणीत काम होते, त्यांच्यासोबत. जय हिंद."