विचार कोणाताही असो; देश अन्‌ महाराष्ट्र सुरक्षित राहिला पाहिजे!

नागपूर हिवाळी अधिवेशन : आमदार महेश लांडगे यांचा आक्रमक पवित्रा

    11-Dec-2023
Total Views | 81

Mahesh Landge


नागपूर :
पुण्यातील कोंढवा परिसरात असलेल्या मस्जिदमध्ये छापा टाकून देशविघातक कारवाई केल्याप्रकरणी एका डॉक्टरला अटक झाली. त्यानंतर विविध ठिकाणी छापे टाकून सुरक्षा यंत्रणांनी ४० जणांना अटक केली. आम्ही सर्व राजकीय पक्षाचे नेते कोणत्याही विचाराचे असोत, पण हा देश आणि महाराष्ट्र सुरक्षित राहीला पाहिजे. त्यासाठी कठोर कार्यवाही करावी, अशी आक्रमक मागणी भाजप आमदार महेश लांडगे यांनी केली.
 
नागपूर येथे राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पुणे, मुंबईसह प्रमुख शहरातील देशविरोधी कारवायांबाबत चर्चा झाली. यामध्ये आमदार लांडगे यांनी आक्रमपणे भूमिका मांडली. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी सभागृहात ठाण्यात एनआयए आणि एटीएसने केलेल्या कारवाईबाबत मुद्दा उपस्थित केला. देशविरोधी कारवाईबाबत विशिष्ट समाजातील लोकांच्या घरी कोणतेही नोटीस न देता छापा मारण्यात आला. १५ लोकांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या कुटुंबियांना कोणतीही कल्पना नव्हती, अशी भूमिका मांडली.
 
यावर, आमदार लांडगे यांनी अबू आझमी यांना जोरदार प्रत्त्यूत्तर दिले. आमदार लांडगे म्हणाले की, "समाजवादी पक्षाचे पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मुद्दा उपस्थित केला. पण, पुण्यामध्ये अतिरेकी कारवाया सुरू झाल्या आहेत. ‘एनआयए’ आणि ‘एटीएस’ने दि. १८ जुलै २०२३ रोजी पुण्यात करवाई केली. कोंढवा परिसरातील एका मस्जिदमध्ये एक भूलतज्ञ डॉक्टर पकडण्यात आला. त्यानंतर महिनाभराने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह येणार होते. त्यानंतरच्या काळात ४ आतंकवादी पकडल्याचे समोर आले. आम्ही कोणत्याही पक्षाचे असो…विचाराचे असो… पण, हा देश आणि महाराष्ट्र सुरक्षित राहिला पाहिजे, अशी आमची भावना आहे," असे ते म्हणाले.
 
"मुंबई, पुणे सह प्रमुख शहरांतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एनआयए आणि एटीएस कारवाई करीत असेल, ४० लोकांना ताब्यात घेत असेल, तर आपल्या अधिकाऱ्यांचे कौतूक करायला हवे. मात्र, आमदार अबू आझमी त्या कारवाईवर आक्षेप घेत होते. पुण्यात मशिदीत छापा टाकण्यात आला. त्याठिकाणी देशविरोधी कृत्य करणारा डॉक्टर सापडला. केवळ मुंबई नव्हे, तर चार ठिकाणी कारवाई झाली आहे. त्यामुळे कारवाईवर आक्षेप घेण्यापेक्षा देश आणि महाराष्ट्र सुरक्षित राहिला पाहिजे, अशी माझी भूमिका आहे."
- महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड.


 
अग्रलेख
जरुर वाचा
क्षमापत्र नाही, चित्रपट प्रदर्शित होणार नाही; कमल हसन यांचा कर्नाटकमध्ये ठाम निर्णय!

"क्षमापत्र नाही, चित्रपट प्रदर्शित होणार नाही"; कमल हसन यांचा कर्नाटकमध्ये ठाम निर्णय!

"कन्नड भाषा तमिळमधून जन्मली" या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अभिनेता कमल हसन यांनी मंगळवारी कर्नाटक उच्च न्यायालयात स्पष्ट केलं की, त्यांच्या आगामी थग लाईफ या चित्रपटाचा कर्नाटकमधील प्रदर्शन सध्या स्थगित करण्यात आला असून, त्यांनी कोणतेही क्षमापत्र देण्याची आवश्यकता नाही असं त्यांचं मत आहे. या वक्तव्यानंतर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटलं की, "तुम्ही कितीही मोठे कलाकार असलात, तरी जनतेच्या भावना दुखावण्याचा तुम्हाला अधिकार नाही." एका साध्या क्षमापत्रामुळे हा वाद मिटू शकला ..

भुस्खलनामुळे अडकले महाराष्ट्रातील ४० पर्यटक!

भुस्खलनामुळे अडकले महाराष्ट्रातील ४० पर्यटक!

अतिवृष्टी आणि तिष्टा नदीला पूर आल्याने सिक्कीम लॅचुंग येथे भुस्खलनाची घटना घडली. या ठिकाणी महाराष्ट्रातील ४० पर्यटक अडकले होते. या घटनेसंदर्भात राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून सिक्कीम येथील आपत्कालीन कार्य केंद्राशी तात्काळ संपर्क साधण्यात आला. या संदर्भात सिक्कीम प्रशासन यांनी सूचना/ अॅडवायजरी निर्गमित केल्या आहेत. याविषयी महाराष्ट्र सदन येथील निवासी आयुक्त यांनी सिक्कीम प्रशासनाशी संपर्क साधला. सद्य:स्थितीत पाऊस थांबला असल्याने नॉर्थ सिक्कीम ते गंगटोक रस्ता चालू झाला आहे. रस्ता सुरू झाल्याने अडकलेल्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121