आ. डावखरे यांच्या उपस्थितीत ‘नवदुर्गा सन्मान’

    31-Oct-2023
Total Views | 46

navdurga

ठाणे :
नवरात्र उत्सव पार पडल्यानंतर सालाबादप्रमाणे यंदाही नवदुर्गांचा सन्मान सोहळा रविवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी ‘राजे संस्कार प्रतिष्ठान’ने काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे येथे आयोजित केला होता. सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून कोकण पदवीधर मतदार संघाचे आ. निरंजन डावखरे यांची उपस्थिती लक्षणीय ठरली.

‘राजे संस्कार प्रतिष्ठान’ या संस्थेमार्फत दरवर्षी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या नऊ महिलांचा ‘नवदुर्गांचा सन्मान’ या उपक्रमांतर्गत केला जातो. या वर्षीही अशाच विविध क्षेत्रात कार्य करणार्‍या आणि संघर्षमय जीवनास सामोरे जाऊन आपलीस्वप्न साकार केलेल्या नऊ महिलांचा सन्मान आ. निरंजन डावखरे यांच्या हस्ते करण्यात आला.
 
आदर्श विकास मंडळाचे अध्यक्ष सचिन मोरे, भाजप शिक्षक आघाडीचे कोकण विभाग संयोजक किशोर पाटील व स्लम सेलचे अध्यक्ष कृष्णा भुजबळ आदी उपस्थित होते. प्रास्ताविक संगीता रोकडे, सूत्रसंचालन साधना जाधव यांनी केले तर आभार प्रा. संभाजी शेळके यांनी मानले.

अग्रलेख
जरुर वाचा
जर चीनने ब्रह्मपुत्रेचे पाणी अडवले तर...; पाकिस्तानच्या धमकीला आसामच्या मुख्यमंत्र्यांचं सडेतोड प्रत्युत्तर!

"जर चीनने ब्रह्मपुत्रेचे पाणी अडवले तर..."; पाकिस्तानच्या धमकीला आसामच्या मुख्यमंत्र्यांचं सडेतोड प्रत्युत्तर!

(India-Pakistan Tensions) पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाने पाकिस्तानी प्रशासन आणि लष्करी यंत्रणांना पूर्णपणे हादरवून टाकले होते. तरीही पाकिस्तानचे भारताविरुद्ध सतत चिथावणीखोर विधाने करणे आणि पोकळ धमक्या देणे अद्याप सुरुच आहे. आणि आता पुन्हा चीनचे नाव पुढे करुन एक नवी धमकी दिली आहे. "जर भारताने सिंधू जल करारावरील स्थगिती मागे घेतली नाही, तर चीन ब्रह्मपुत्रा नदीचा प्रवाह अडवू शकतो, ज्यामुळे भारताला नुकसान सहन करावे लागेल", अशी पोकळ धमकी पाकिस्तानने ..

भारताच्या हवाई हल्ल्यात पाकचे मोठे नुकसान; उपग्रह प्रतिमांमध्ये सत्य स्पष्ट

भारताच्या हवाई हल्ल्यात पाकचे मोठे नुकसान; उपग्रह प्रतिमांमध्ये सत्य स्पष्ट

ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने केलेल्या हवाई हल्यात पाकिस्तानचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भारत-पाकच्या चार दिवसांच्या हल्ल्याच्या चकमकीतील ५० वर्षातील ही सर्वात मोठी लढाई होती. युद्धात दोन्ही देशांनी एकमेकांच्या हवाई हल्ल्याच्या क्षमतेची परीक्षा घेत एकमेकांच्या लष्करी तळांवर हल्ला केला. परंतु आता उपग्रह प्रतिमांमध्ये सत्य स्पष्ट झाले आहे. युद्धादरम्यान, हल्ल्यांसाठी दोन्ही देशांनकङून क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा वापर करण्यात आला. दोन्हीही देशांनी एकमेकांना जास्तीत जास्त नुकसान पोहोचवल्याचा दावा केला. ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121