शेती विकासात कृषि विज्ञान केंद्रांची भुमिका महत्त्वाची!

केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांचे प्रतिपादन

    19-Jan-2023
Total Views |
नरेंद्रसिंग तोमर

पुणे
: भारतीय शेतीच्या विकासात कृषि विज्ञान केंद्रांची भुमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी केले आहे. भारतीय कृषि अनुसंधान परिषदे अंतर्गत अटारी पुणे कार्यालयाचे उद्‌घाटन नरेंद्रसिंग तोमर यांच्या हस्ते संपन्न झाले, त्याप्रसंगी ते ऑनलाइन पद्धतीने बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी, भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे सहाय्यक महानिदेशक (कृषि विस्तार) डॉ. व्ही. पी. चहल, महात्मा फुले कृषि विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, अटारी पुणेचे संचालक डॉ. लाखन सिंग यांची उपस्थिती होती. तर भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे उपमहानिदेशक (कृषि विस्तार), काणेरी मठ कोल्हापूरचे अध्यक्ष परम पूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांची ऑनलाइन उपस्थिती होती.

कृषी औद्योगिक संशोधन संस्था अटारी पुणे च्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या दूरस्थ उपस्थितीत आणि केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
 
पुढे बोलतांना केंद्रीय कृषिमंत्री म्हणाले की, देशात सध्या 783 कृषि विज्ञान केंद्र कार्यरत झाले असून सध्याच्या बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ आपली महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. भारतीय कृषि अनुसंधान परिषदेने या संदर्भात अनेक हवामान अनुकूल तसेच जैवसंपृक्त वाण विकसित केले आहेत. कोविड काळात सुद्धा कृषि क्षेत्राचे काम उल्लेखनीय राहिले असून भारत आता मागणारा नाही तर देणारा देश झाला आहे. भविष्यात कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांना अधिक जबाबदारीने काम करावे लागेल असे ते म्हणाले.

कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी म्हणाले की, देशाला सध्या नैसर्गिक शेती आणि पौष्टिक तृणधान्ये वाढीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. माननीय पंतप्रधान कृषि क्षेत्राच्या पायाभूत विकासाच्या बाबतीत सकारात्मक असून कृषि विज्ञान केंद्राचे कृषि क्षेत्रातील योगदान पाहता भविष्यात कृषि विज्ञान केंद्रांना अधिक बळकट करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.






अग्रलेख
जरुर वाचा
डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

जगभरात भारताच्या डिजिटल प्रगतीची प्रशंसा केली जाते. ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय)ची सेवा जगभरातील काही देशांनी स्वीकारली आहे. भारताची डिजिटल क्षेत्रातील ही प्रगती विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे स्मार्ट पाऊल म्हणावे लागेल. मोदी सरकारला नुकतीच ११ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, सरकारच्या अनेक उपलब्धींपैकी एक असलेल्या डिजिटल व्यवहार प्रणालीचेही विशेषत्वाने कौतुक करण्यात आले. पण, अशापद्धतीने व्यवहार करताना बँक ग्राहकांनी ‘यूपीआय’ आणि ‘डिजिटल वॉलेट’ पेमेंट सिस्टममधील फरक समजून घेण्याबरोबरच खबरदारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121