भटक्या कुत्र्यांची समस्या सोडवण्यासाठी राज्यात ‘श्वान दत्तक योजना’ राबवा

आ. सरनाईक यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

    26-Sep-2022
Total Views | 79


sarnaik
 
 
ठाणे:  “राज्यभरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून रस्तोरस्ती कुत्र्यांच्या टोळ्या पाहावयास मिळत आहेत. भटक्या कुत्र्यांची समस्या दूर करण्यासाठी ठोस धोरण ठरवून ’श्वान दत्तक योजना’ राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सुरु करण्यात यावी,” अशी मागणी आ. प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
 
 
सध्या राज्यभरात भटक्या कुत्र्यांच्या समस्येची चर्चा होत आहे. लाखो भटके कुत्रे असून त्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. भटक्या कुत्र्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. याबाबत स्थानिक यंत्रणा किंवा राज्य सरकारने तोडगा काढावा, ठोस धोरण ठरवावे, अशी मागणी होत आहे. ठिकठिकाणी श्वानदंशाच्या घटना घडत आहेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्य नागरिक यात जखमी होतात, तर भटके कुत्रे मागे लागल्याने वाहनांचे अपघातही होतात.
 
 
अशा अनेक गोष्टींचा त्रास होत असल्याने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरीत असून अनेकदा सर्वसामान्य नागरिक आणि श्वानप्रेमी यांच्यात संघर्ष होत असल्याचेही दिसते. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची समस्या दूर करण्यासाठी राज्य सरकारने स्पष्ट धोरण ठरवून ’श्वान दत्तक योजना’ सुरू करावी, अशी सूचना आ. प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121