मुंबई : भाजपसारख्या जुन्या मित्राच्या पाठीत खंजीर खुपसून आठव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होण्याचा विक्रम करणाऱ्या नितीश कुमार यांचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. भाजप मित्रपक्षांना संपवतो हे २०१९ मध्येच लक्षात आल्याने आपण भाजपची साथ सोडली असे वक्तव्य ठाकरे यांनी केले. येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची बैठक बोलावण्यात आली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.
भाजप आपल्याच मित्रपक्षांना मागल्या दाराने हळू हळू संपवतो, म्हणून नितीश कुमारांनी बिहार मध्ये सत्ता परिवर्तन करून भाजपला धडा शिकवला अशा शब्दांत महाराष्ट्राच्या या माजी मुख्यमंत्र्यांनी नितीश कुमारांचे अभिनंदन केले. शिवसेनाप्रमाणेच नितीश कुमार यांनीही भाजपला धोका देत आपल्या जुन्या साथीदाराला धोका देत त्यांच्याच परंपरागत विरोधक लालूप्रसाद यांच्या राजदशी दुसऱ्यांदा हातमिळवणी करत पुन्हा बिहारचे मुख्यमंत्रीपद पटकावले. याचेच उद्धव ठाकरेंना आता कौतुक वाटत आहे
मुंबईतील बदललेल्या वार्ड रचनेवर चर्चा करण्यासाठी शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची बैठक उद्धव ठाकरेंनी बोलावली होती. याच बैठकीत ते बोलत होते. ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान देत उठाव करणाऱ्या शिंदे गटाचे कुठलेही आमदार, खासदार पुन्हा निवडून येणार नाहीत अशी नेहमीची बडबड देखील त्यांनी या बैठकीत केली.