नितीश कुमारांना धोक्याचा इशारा ? उद्धव ठाकरेंकडून अभिनंदन

    12-Aug-2022
Total Views | 123
 
bihar
 
 
मुंबई : भाजपसारख्या जुन्या मित्राच्या पाठीत खंजीर खुपसून आठव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होण्याचा विक्रम करणाऱ्या नितीश कुमार यांचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. भाजप मित्रपक्षांना संपवतो हे २०१९ मध्येच लक्षात आल्याने आपण भाजपची साथ सोडली असे वक्तव्य ठाकरे यांनी केले. येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची बैठक बोलावण्यात आली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.
 
भाजप आपल्याच मित्रपक्षांना मागल्या दाराने हळू हळू संपवतो, म्हणून नितीश कुमारांनी बिहार मध्ये सत्ता परिवर्तन करून भाजपला धडा शिकवला अशा शब्दांत महाराष्ट्राच्या या माजी मुख्यमंत्र्यांनी नितीश कुमारांचे अभिनंदन केले. शिवसेनाप्रमाणेच नितीश कुमार यांनीही भाजपला धोका देत आपल्या जुन्या साथीदाराला धोका देत त्यांच्याच परंपरागत विरोधक लालूप्रसाद यांच्या राजदशी दुसऱ्यांदा हातमिळवणी करत पुन्हा बिहारचे मुख्यमंत्रीपद पटकावले. याचेच उद्धव ठाकरेंना आता कौतुक वाटत आहे
  
मुंबईतील बदललेल्या वार्ड रचनेवर चर्चा करण्यासाठी शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची बैठक उद्धव ठाकरेंनी बोलावली होती. याच बैठकीत ते बोलत होते. ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान देत उठाव करणाऱ्या शिंदे गटाचे कुठलेही आमदार, खासदार पुन्हा निवडून येणार नाहीत अशी नेहमीची बडबड देखील त्यांनी या बैठकीत केली.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
मुंबई लोकल अपघात : मृतांचा आकडा ८ वर; वाचा दिवसभरात काय घडलं?

मुंबई लोकल अपघात : मृतांचा आकडा ८ वर; वाचा दिवसभरात काय घडलं?

आठवड्याचा पहिलाच दिवस मध्य रेल्वेसाठी काळा दिवस ठरला आहे. कसारा-सीएसएमटी लोकल मार्गावरून प्रवास करणाऱ्या ८ जणांचा सोमवार दि.९ रोजी रुळावर पडून मृत्यू झाला आहे. कसाऱ्याकडून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधून नऊ ते दहा प्रवासी खाली पडले आणि त्यापैकी आठ जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवार, दि. ९ रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. "सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास या घटनेची माहिती मिळाली होती. मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान ही घडली. फूटबोर्डवर उभ्या असलेल्या या प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागला आणि ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121