मुंबई : राष्ट्रवादी आमदारांच्या ३ जुलै रोजी झालेल्या बैठकीत शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना मध्यावधी निवडणुकीसाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान,पवारांच्या या विधानाला भाजपकडून विरोध दर्शवला जात आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विटरवरून पवारांना प्रत्युत्तर दिले आहे. "साहेबांना पेढे दिले नाही म्हणून इतका राग आला की रागात म्हणाले हे सरकार सहा महिने टिकेल. पेढे मिळाले नाही म्हणून इतका राग??" असा टोला राणेंनी लगावला आहे.
"पवार बोलतात त्याच्या विरुद्धच घडतं. आमचं सरकार पुढची वर्षानुवर्षे टिकेल." असे म्हणत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी पवारांवर टीका केली आहे. एकीकडे निलेश राणेंच्या ट्विटची चर्चा होत असताना दुसरीकडे, पवारांचे मत योग्य आहे. राज्यात मध्यावधी निवडुका होतील, असे महाविकास आघाडीचे नेते म्हणत आहेत.