ठाणे परिघातील जलवाहतूक ६ वर्षं रखडली

कल्याण-डोंबिवली, ठाणे, वसई आणि भाईंदर जलवाहतूक दिवाळीपर्यंत?

    26-May-2022
Total Views | 68

water trancport
 
 
 
 
 
 
ठाणे : ठाणे शहराला लाभलेला ३२ किमी लांबीचा खाडी किनारा आणि रस्ते व अन्य प्रवासाच्या ताणावर जलवाहतुकीचा नवा पर्याय उभारण्यासाठी गेल्या सहा वर्षांपासून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्याप हे काम रेंगाळलेले असून आता कल्याण-डोंबिवली-ठाणे-वसई-भाईंदर ही जलवाहतूक दिवाळीपर्यंत सुरू होणार असल्याचे दावे लोकप्रतिनिधींकडूनकेले जात आहेत.
 
 
 
ठाणे महानगरपालिकेच्या पुढाकाराने सहा महापालिकांना जोडणार्‍या जलवाहतूक प्रकल्पाला केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. सदर प्रकल्प टप्प्याटप्प्यात होणार असून, पहिल्या टप्प्यात कोलशेत, भिवंडी, काल्हेर, डोंबिवली, भाईंदर या चार ठिकाणी जेट्टी बांधण्याचे काम सुरू आहे. यातील 98 कोटींच्या प्रकल्पाला केंद्र शासनाच्या ‘सागरमाला’ योजनेतून मान्यता मिळाल्यानंतर ‘महाराष्ट्र मेरीटाईम’ बोर्डामार्फत कामे कार्यान्वित झाली. वर्सोवा जेट्टीचे काम सध्या जोरात सुरू असून ते जुलैमध्ये पूर्ण होईल.
 
 
 
त्यामुळे प्रवासी वाहतुकीचा मार्ग मोकळा होणार असून हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. जलमार्गाचा मोठा पर्याय उपलब्ध होणार असल्याने लोकल तसेच रस्ते वाहतुकीवरील ताणदेखील कमी होईल. जलमार्गामुळे डोंबिवली, ठाणे, वसई, भाईंदर ही चार महत्त्वाची शहरे एकमेकांना जोडली जाणार आहेत. ५० मीटर बाय ७.५ मीटरची ही जेट्टी असून, सात कोटींचा खर्च अपेक्षित आहे. येथील परिसर सुशोभीत करण्यासाठी ५० लाख अपेक्षित खर्च आहे. या अनुषंगाने भाईंदर येथे प्रवासी जेट्टी बांधण्यास सरकारने मंजुरी दिली आहे, तर कोलशेत, काल्हेर व डोंबिवली येथील जेट्टीच्या पहिल्या टप्प्यालादेखीलमान्यता दिली असून, वर्षभरात ही कामे पूर्ण होतील. त्यानंतर जलवाहतुकीने हे भाग जोडले जाणार आहेत. साधारण दिवाळीपर्यंत ही जलवाहतूक सुरू होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. जेसल पार्क जेट्टीसाठी २५ कोटींचा खर्च अपेक्षित असून त्याची निविदा प्रक्रिया तीन महिन्यांत सुरू होणार आहे.
 
 
 
गार्डन, गेम झोन, फूड स्टॉल वर्सोवा येथील जेट्टीचा परिसर सुशोभीत केला जाणार असून या कामाचे भूमिपूजन बुधवारी करण्यात आले. येथील भागात लॅण्ड स्केपिंग गार्डन, गेम झोन, फूड स्टॉलसाठी जागा, विविध प्रकारची झाडे, प्रवाशांना बसण्यासाठी जागा, अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्याशिवाय पर्यटकांना खाडीत फिरण्यासाठी विशेष बोटही सुरू केली जाईल. वर्सोवा जेट्टीचा परिसर पर्यटन केंद्र म्हणून विकसित होणार असून त्यासाठी दहा कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. त्यास सरकारही अनुकूल असल्याचे दिसत आहे.
 
 
 
प्रस्तावित जलवाहतुकीचे मार्ग...
 
ठाणे- वसई- कल्याण हा ५४ किमी लांबीचा जलवाहतूक मार्ग प्रस्तावित असून यामध्ये दहा ठिकाणी जेट्टी बांधून सुविधा पुरविण्याचा प्रस्ताव आहे. तसेच, दुसर्‍या टप्प्यात ठाणे - मुंबई व ठाणे - नवी मुंबई या दोन्ही जलवाहतूक मार्गाचेदेखील नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये ठाणे - मुंबई दहा व ठाणे - नवी मुंबई दरम्यान आठ ठिकाणच्या जेट्टींचा समावेश आहे. याशिवाय मुंबई मांडवा फेरी व रोरो सेवा सुरू आहे. तसेच, नवी मुंबई - मांडवा व नवी मुंबई ते गेट वे ऑफ इंडिया (मुंबई) हा मार्ग प्रस्तावित आहे.
 
 
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121