‘एम्स’च्या सर्व्हरमधील तांत्रिक बिघाड दुरुस्त; ऑनलाईन सेवा लवकरच सुरू होणार

    01-Dec-2022
Total Views | 57

एम्स
 
 
नवी दिल्ली : दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात ‘एम्स’च्या सर्व्हरमध्ये आलेला तांत्रिक बिघाड दुरुस्त झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, ही घटना म्हणजे ‘सायबर हल्ला’ असल्याचा आणि हॅकर्सद्वारे खंडणी मागितल्याचा दावा तथ्यहीन असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे.
 
 
गेल्या आठवड्याभरापासून ‘एम्स’च्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाला असून त्यामुळे रुग्णालयाच्या सेवांवर परिणाम झाला आहे. ऑनलाईन प्रक्रिया ठप्प झाल्याने त्याचा ताण रुग्णालयाच्या विविध सेवांवर पडला आहे. हा बिघाड दुरुस्त करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु असून त्यास यश आल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
 
 
 
प्राप्त माहितीनुसार, ‘एम्स’ प्रशासनाचे म्हणणे आहे की, ‘ई-हॉस्पिटल’चा ‘डेटा सर्व्हर’वर पुनर्संचयित करण्यात आला आहे. परंतु, ‘सर्व्हर’ सुरू करण्यापूर्वी संस्थेचे संपूर्ण संगणक ‘नेटवर्क’ व्हायरसमुक्त केले जात आहे. संस्थेत मोठ्या प्रमाणात संगणक असल्याने प्रक्रियेस विलंब होत आहे. त्यामुळे ‘ओपीडी’, विभाग आणि लॅबमध्ये तपासणी व उपचाराची सुविधा ‘मॅन्युअली’ सुरू राहणार आहे, असेही सांगण्यात आले आहे.
 
 
 
‘एम्स’च्या सर्व्हरवर 2023 नोव्हेंबर रोजी रॅन्समवेअर हल्ला झाल्याची घटना घडली होती. तेव्हापासून ‘एम्स’मध्ये डिजिटल सेवा बंद आहे. संशोधन आणि शिकवण्याच्या कामासाठी डॉक्टर वैयक्तिक मोबाईलवरील इंटरनेटचा वापर करत आहेत.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या बांधणीला आता गती मिळणार आहे. प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्‍या जुळ्या बोगद्यासाठी आवश्‍यक असलेली १९.४३ हेक्‍टर वनजमीन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडे वळती करण्‍यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता मिळाली आहे. त्‍यानुसार, अटी व शर्तींचे अनुपालन तसेच पूर्ततेची ..

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

१ हजार ६५० गावांमध्ये प्राथमिक, तर ६ हजार ५५३ गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नाहीत राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांपैकी सुमारे १८ हजार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे. तर १ हजार ६५० गावांत प्राथमिक आणि ६ हजार ५५३ गावांत उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नाहीत. विद्यार्थी संख्येत घट झाली असली, तरी त्या शाळा सुरूच राहतील आणि त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, तेथे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याची माहिती ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121