नक्षलवाद्यांच्या चकमकीत ५ सैनिक हुतात्मा

    03-Apr-2021
Total Views |

Naxals_1  H x W
 
विजापूर : छत्तीसगड राज्यातील विजापूर भागात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये सुरक्षा दलाचे ५ सैनिक हुतात्मा झाले. यामध्ये सीआरपीएफचे ४ तर डीआरजीचा १ सैनिकांचा समावेश आहे. अचानक झालेल्या या चकमकीत एका नक्षलीचा खात्मा करण्यात आला. छत्तीसगडमधील ही १० दिवसांतील दुसरी घटना असून यापूर्वी २३ मार्चला झालेल्या हल्ल्यात ५ जवान शहीद झाले होते. या हल्ल्यामध्ये नक्षलवाद्यांनी नारायपूरमध्ये आयईडी स्फोटातून हा हल्ला घडवला होता.
 
 
 
 
पोलिस अधीक्षक कमल लोचन यांनी सांगितले की, "सध्या सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकी सुरु असून यामध्ये अजून काही जवान गंभीर असल्याचे माहित मिळत आहे. ही घटना विजापूरमधील टेरिम पोलिस स्टेशनच्या परिसरातील झीरम हल्लाचा मास्टरमाइंड हिडमाच्या गावात सुरु आहे. यामध्ये सामील नक्षलवादी या टीमचे सदस्य असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गावात बरेच नक्षलवाद्यांची जमावजमव सुरु असल्याची बातमी सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानुसार ही टीम त्यांच्या शोधासाठी बाहेर पडली होती."
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या बांधणीला आता गती मिळणार आहे. प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्‍या जुळ्या बोगद्यासाठी आवश्‍यक असलेली १९.४३ हेक्‍टर वनजमीन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडे वळती करण्‍यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता मिळाली आहे. त्‍यानुसार, अटी व शर्तींचे अनुपालन तसेच पूर्ततेची ..

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

१ हजार ६५० गावांमध्ये प्राथमिक, तर ६ हजार ५५३ गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नाहीत राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांपैकी सुमारे १८ हजार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे. तर १ हजार ६५० गावांत प्राथमिक आणि ६ हजार ५५३ गावांत उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नाहीत. विद्यार्थी संख्येत घट झाली असली, तरी त्या शाळा सुरूच राहतील आणि त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, तेथे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याची माहिती ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121