‘एमआयडीसी’चा ‘सर्व्हर हॅक’!

    30-Mar-2021
Total Views | 158

midc data hack_1 &nb


‘हॅकर्स’कडून तब्बल ५०० कोटींची मागणी



मुंबई, (अल्पेश करकरे) :
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा (एमआयडीसी) ‘सर्व्हर हॅक’ झाल्याची खळबळजनक माहिती सोमवार, दि. २९ मार्च रोजी समोर आली. ‘हॅकर्स’नी तब्बल ५०० कोटी रुपयांची मागणी केल्याची माहिती मिळत आहे. ही मागणी पूर्ण न झाल्यास ‘हॅक’ करण्यात आलेल्या ‘सर्व्हर’वरील सर्व महत्त्वाचा डाटा नष्ट करण्याची धमकीही ‘हॅकर्स’नी दिल्याचे समजते. हे ‘हॅकर्स’ देशातील आहेत की, परदेशातील यासंदर्भात अजूनही माहिती उपलब्ध झाली नसली, तरी त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे. यासंदर्भात मंत्री सुभाष देसाई यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया यावर दिलेली नाही.


मात्र, ‘एमआयडीसी’चा ‘डेटा हॅक’ झाल्याचे समोर येताच ‘एमआयडीसी’ प्रादेशिक कार्यालयात उद्योजकांकडून चौकशी सुरू करण्यात आली असून, ‘सर्व्हर’ची ‘सिस्टीम’ व्यवस्थित होईपर्यंत कामकाजाची पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी उद्योजकांसह औद्योगिक संघटनांकडून होत आहे.


मागील सोमवारपासून ‘एमआयडीसी’चा ‘सर्व्हर हॅक’ झाल्याने राज्यातील मुंबईतील मुख्य कार्यालयासह १६ प्रादेशिक कार्यालयातील संपूर्ण कामकाज बंद पडले आहे. ‘एमआयडीसी’शी संबंधित सर्व औद्योगिक वसाहती त्यातील उद्योजक संबंधित शासकीय घटक आणि विविध योजनांची संपूर्ण माहिती ‘ऑनलाईन सिस्टीम’मुळे ‘सर्व्हर’वर आहे. हा ‘ऑनलाईन डाटा’ सर्व्हर हॅक झाल्याने कामकाज ठप्प झाले आहे. संगणक सुरू केल्यास ‘व्हायरस’ दिसत असून ‘सिस्टीम’मध्ये प्रवेश केल्यास ‘डाटा’ नष्ट होण्याचा धोका आहे, अशी परिस्थिती सगळ्याच ‘एमआयडीसी’ कार्यालयांमध्ये आहे.


त्यामुळे ‘एमआयडीसी’ने सर्व कार्यालयांना संगणक ओपन न करण्याच्या सूचना केल्या आहेत. ‘एमआयडीसी’ची आयटी टीम ‘अ‍ॅक्टिव्ह सर्व्हर हॅक’ झाल्यानंतर ‘एमआयडीसी’च्या सर्व कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी कमालीची गुप्तता पाळली आहे. ‘डेटा हॅक’ झाल्याची माहिती त्यांनी समोर येऊ दिली नाही. ‘सिस्टीम’मध्ये ‘व्हायरस’ शिरल्याने काम बंद आहे, असे अधिकारी, कर्मचारी ‘एमआयडीसी’ कंपन्यांना जोडलेल्या उद्योजकांना सांगत आहेत. पण, प्रत्यक्षात ‘सर्व्हर हॅकर्स’नी ‘हॅक’ केल्याबाबत मात्र कमालीची गुप्तता पाळली जात आहे. ‘एमआयडीसी’चा सर्व्हर बंद असल्याने ‘एमआयडीसी’शी संबंधित कामांवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे ‘वन विंडो सिस्टीम’ (एक खिडकी व्यवस्था) व ऑफलाईन सिस्टीमद्वारे कामे पूर्ण करण्यासाठी सुविधा देण्याची मागणी ‘स्मॅक’चे अध्यक्ष अतुल पाटील यांनी केली आहे.


राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय निविदांवर परिणाम ‘एमआयडीसी’ने औद्योगिक विकासातील योजना आणि कामासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून निविदा मागविल्या आहेत. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात या ऑनलाईन निविदा ओपन करण्यात येणार होत्या. यामध्ये मुंबई मेट्रो लाईनच्या महत्त्वाच्या कामाचाही समावेश आहे. पण, ‘सर्व्हर’ बंद पडल्याने या निविदा प्रक्रियेवर परिणाम होण्याचा धोका आहे. ‘एमआयडीसी’च्या बंद ‘सर्व्हर’संदर्भात प्रादेशिक अधिकारी धनंजय इंगळे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सिस्टीम पूर्ववत होण्यासाठी तीन, चार दिवस लागतील, असे सांगितले. या काळात मार्च एण्डिंग असल्याने उद्योजकांची गैरसोय होऊ नये यासाठी ऑफलाईन काम आणि ‘सिंगल विंडो सिस्टीम’ सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.


अनोळखी व्यक्तींकडून जो ‘डेटा हॅक’ झाला आहे, यासंदर्भात ‘एमआयडीसी’ प्रशासनाने तत्काळ ‘सायबर सेल’कडे तक्रार करायला हवी व ‘हॅकर्स’चा शोध घ्यायला हवा. तसेच ‘हॅक’ झालेला ‘डेटा रीस्टोर’ करून घ्यावा व ‘सिस्टीम लॉक’ करावी. जेणेकरून ‘हॅकर्स’ला काहीही करता येणार नाही. ज्याप्रमाणे ‘एमआयडीसी’सोबत हे प्रकरण घडले आहे ते खंडणी उकळण्यासाठी ‘हॅकर्स’ करत असतात. प्रशासनाने न घाबरता याला योग्य पद्धतीने हाताळायला हवे. उद्योजकांनीही याला घाबरता कामा नये, असे अनेक ‘हॅकर्स अ‍ॅक्टिव्ह’ आहेत. मात्र, त्यांना न घाबरता ‘सिस्टीम रिस्टोर’ करून ‘डेटा क्लीनप’ करावा, जेणेकरून त्यांना काही करता येणार नाही व आपलाही तोटा होणार नाही.
- अ‍ॅड. डॉ. प्रशांत माळी, आंतरराष्ट्रीय सायबर एक्स्पर्ट




चौकशीची गरज
ज्या सरकारमधील मुख्यमंत्र्यांचे नियंत्रण ऊर्जा विभागावर नाही त्या ठिकाणी ‘डेटा हॅक’ होतो. तसेच गृह विभागामध्ये देखील तीच परिस्थिती आहे. तसेच वाझेसारखे गुन्हेगार डेटा मिटवण्याचा प्रयत्न करतात. तर ‘एमआयडीसी’मध्येही झालं असेल, तर साहजिकच आहे. हे फक्त पैसे कमावण्यासाठी सत्तेत आहेत, त्याचे प्रशासन आणि व्यवस्थेवर लक्ष नाही. त्यामुळे अशी प्रकरणे घडत आहेत. ‘डेटा लिक’ होणं ही गंभीर बाब आहे, याची चौकशी व्हायला हवी.
- विश्वास पाठक, भाजप नेते


अग्रलेख
जरुर वाचा
क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

क्रीडा विद्यापीठ: क्रीडा क्षेत्रातील एक महत्वपूर्ण पायरी

भारतात केंद्रीय पातळीवर नवीन विद्यापीठ स्थापन करण्याची प्रक्रिया मुख्यत्वे शिक्षण मंत्रालय आणि त्याखालील उच्च शिक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते. यासंदर्भात विद्यापीठाच्या मान्यता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी ‘विद्यापीठ अनुदान मंडळ’ (णॠउ)देखील महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच, जर एखादे विद्यापीठ राज्यस्तरीय किंवा खासगी स्वरूपाचे असले, तर संबंधित राज्याचा उच्च शिक्षण विभाग किंवा राज्य सरकारचा इतर संबंधित विभाग अथवा संस्था त्यांच्यासोबत समन्वयाच्या भूमिकेत आवश्यक मंजुरी व नियमनासाठी कार्य ..

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळातील भारतीय शिक्षणव्यवस्था

प्राचीन भारतीय शिक्षणव्यवस्था कशा प्रकारची होती आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवनासाठी त्या व्यवस्थेच्या विविध आयामांचे आकलन का महत्त्वाचे आहे, हे आपण पाहिले. अब्राहमिक विचाराधारांशी संघर्ष झाल्यावर या व्यवस्थेला उतरती कळा कशी लागली, याही विषयाचा थोडयात आढावा आपण घेतला. वसाहतवादाचा शिक्षणावरील परिणाम हा एक समग्र ८०० ते एक हजार वर्षांच्या कालखंडाचा इतिहास आहे. परंतु, ब्रिटिश वसाहतवाद हा एक प्रकारचा सैद्धांतिक वर्चस्ववादही असल्याने या कालखंडातील शैक्षणिक अधोगतीला अनेक पैलू जोडले जातात. ब्रिटिशांचे पारतंत्र्य व ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121