“भारतातले ३० टक्के मुसलमान एकत्र आले, तर चार पाकिस्तानची निर्मिती होऊ शकते,” असे विषारी फुत्कार काढणार्या शेख अलममुळे तृणमूलच्या तुष्टीकरणाचा राष्ट्रदोही अजेंडा पुनश्च उघड्यावर पडला. तेव्हा, बंगाली हिंदू मतदारही आज होऊ घातलेल्या पहिल्या टप्प्यातील मतदानात या नापाक बांगा ध्यानी ठेवूनच मतपेटीतून दीदींना उर्वरित ७० टक्क्यांची ताकद दाखवून देतील.
पश्चिम बंगाल निवडणुकीचे रण चांगलेच तापले असताना, तृणमूल काँग्रेसच्या एका धर्मांध नेत्याच्या विषारी विधानामुळे राजकीय वातावरण अधिकच चिघळले. बंगालच्या वीरभूम जिल्ह्यातील नन्नूर येथे तृणमूल काँग्रेसचे उमेदवार बिधान चंद्र माजी यांच्या प्रचारफेरीत शेख अलम नामक तृणमूलच्या नेत्याने मुस्लीम मतदारांना चक्क पाकिस्तानी मुस्लीम एकतेचा हवाला दिला. अलम म्हणतो, “देशातील ३० टक्के मुस्लीम एकत्र आले, तर चार पाकिस्तान तयार होतील. भाजपला वाटते, ते ७० टक्क्यांच्या बळावर बंगालमध्ये सत्तेत येतील. पण, आम्ही एकत्र आलो तर हे ७० टक्के कुठे जातील?” आता कोणी शेंबडं पोरही सांगेल की, ३० टक्क्यांपेक्षा ७० टक्के हे कधीही भारीच! पण, शेखच्या या हिरव्या फुत्कारांचा अर्थ सांख्यिक नव्हे, तर धार्मिक कट्टरतेचीच पोलखोल करतो.
३० टक्के मुसलमानही ७० टक्के हिंदूंचे दमन करू शकतात, अशी चिथावणी देण्याचाच हा जिहादी मार्जोडेपणा! ऐन मतदानाच्या आदल्या दिवशी तृणमूलच्या नेत्याची ही धार्मिक विष कालवणारी भाषाच दीदींच्या पक्षाचा अजेंडा खरंतर पदार्फाश करणारी. पण, या विधानाचे तीव्र पडसाद उमटताच तृणमूलने चक्क घुमजाव करत शेखशी तृणमूलचा संबंधच नसल्याचे सांगत हात वर केले. शेखच्या विधानावर आता तृणमूलने कितीही सारवासारव केली तर उपयोग मात्र शून्यच! कारण, हा शेख २०११ साली दीदींचे सरकार येण्यापूर्वी एका बॉम्बस्फोटाच्या खटल्यात तीन वर्षं तुरुंगवास भोगून आलेला. दीदींची सत्ता येताच त्याचा पक्षप्रवेशही झाला. आज तो तृणमूलच्या ब्लॉक कमिटीचा सदस्य असून, पक्षाच्या सर्व स्थानिक कार्यक्रमात चमकोगिरीतही अगदी अग्रेसर. तृणमूलच्या उमेदवाराचा प्रचार करताना दीदींचे बॅनरही अभिमानाने झळकवणारा हा नेता.
एवढेच नाही तर या शेखचा अवैध वाळू तस्करीचा गोरखधंदाही जोरात असून त्यालाही तृणमूलचे अभय. असे एक नव्हे तर कित्येक शेख आणि गावगुंड हीच काय ती तृणमूलची ताकद, ज्यांच्या बळावर दीदींनी दादागिरी करत, चिटफंडांतून वसुली करत बंगालला वेळोवेळी हिंसाचाराच्या गर्तेत लोटले. परिणामस्वरूप, या बांडगुळांची बंगालमध्ये इतकी वळवळ वाढली की, आज हिंदूंना थेट धमकावण्यापर्यंत त्यांची मजल गेली. परंतु, ही जिहादी-पाकवादी मानसिकता बंगालमध्ये फोफावली तीच मुळी ममतादीदींच्या तुष्टीकरणाच्या असंतुलित तराजूमुळे!
आज निवडणुकीच्या तोंडावर ‘मी ब्राह्मण, मी हिंदू’ म्हणून मंदिरांच्या पायर्या झिजवणार्या दीदींनी हिंदू मतदारांना इतके वर्ष फक्त गृहितच धरले. आपण काहीही केले, कसेही वागलो तरी हिंदू समाज आपल्या पाठीशी समर्थपणे उभा राहील, या भ्रमातच दीदींनी मुसलमानांच्या दाढ्या कुरवाळण्याचे उद्योग केले. हिंदू बांधव जणू बंगालमध्ये दुय्यम नागरिक असल्याप्रमाणेच हीन वागणूक दीदींनी दिली. बंगालची आन-बान-शान असलेल्या दुर्गापूजेसाठी तेथील हिंदूंना न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागले. मोहरमच्या मिरवणुकांना परवानगी आणि दुर्गापूजेच्या विसर्जनावर बंदी, अशी हिंदूद्वेषी भूमिका घेताना मात्र आपण हिंदू, ब्राह्मण वगैरे असल्याचे दीदींच्या अगदी सोयीस्करपणे विस्मरणातच गेले.
सरकारी अनुदान, मानधनं यांचे फायदे कसे अधिकाधिक मौलवींना, मदरशांना होतील म्हणून तिजोरीतूनही घसघशीत तजवीज दीदींनी गेली. बांगलादेशी घुसखोर, रोहिंग्या यांचीही दीदींनी तळी उचलली. आपल्या या हक्काच्या व्होटबँकेला धक्का लागू नये म्हणून ‘सीएए’, ‘एनआरसी’लाही दीदींनी कडाडून विरोध केला. ‘जय श्रीराम’ ऐकून तर दीदींच्या तळपायाची आग अगदी मस्तकात जाते. अशा हिंदूविरोधी भूमिका का, तर केवळ आणि केवळ मुस्लीम मतांवर डोळा ठेवूनच! आपली मुस्लीम व्होटबँक अशाच पद्धतीने दीदींनी ‘सेक्युलॅरिझम’च्या बुरख्याआड तुष्टीकरणातून उभी केली अन् पोसलीही. राज्यातील सामाजिक सलोख्याला दीदींच्या याच धोरणांनी सुरुंग लावला. एकट्या बंगालमध्येच मालदा, बसिरहाट, हुगळी अशा कित्येक ठिकाणी जातीय दंगली उसळल्या.
भाजप कार्यकर्त्यांबरोबरच इतर निरपराध हिंदूंचे खून पाडण्यापासून ते त्यांची घरं जाळण्यापर्यंत या जिहाद्यांची मजल गेली ती दीदींच्या मुस्लीम लांगुलचालनामुळेच! पण, दीदींना याची ना खंत ना खेद. उलट मुस्लीम व्होटबँक केंद्रस्थानी ठेवून दक्षिण कोलकाता विधानसभा मतदारसंघातून यंदा निवडणूक लढवण्यापेक्षा दीदींनी नंदिग्रामची वाकडी वाट धरली. कारण, अगदी स्पष्ट आहे. द. कोलकाता मतदारसंघात आपला पराजय दिसू लागताच मुस्लीम मतांच्या अभिलाषेने दीदींची पावलं आपसूक नंदिग्रामकडे वळली. या विधानसभा मतदारसंघात २.१३ लाख मतदारांपैकी जवळपास ६२ हजार मतदार हे अल्पसंख्याक समुदायाचे असल्यामुळेच दीदींना आपले नाक राखण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला. दीदींच्या अशाच धर्मांध वागणुकीमुळे तृणमूल काँग्रेसमधील कित्येक नेत्यांनी भाजपची वाट धरली आणि त्याचे सकारात्मक परिणामही यंदाच्या निवडणुकीत नक्कीच दिसून येतील.
पण, या निमित्ताने पुन्हा एकदा भारतीय मुसलमानांना पाकिस्ताची दुहाई देऊन त्यांना भडकावण्याच्या जिहादी उद्योगांकडेही तितक्याच गांभीर्याने लक्ष देण्याची गरज अधोरेखित होते. ज्या पाकिस्तानची शेखी या अलमने मिरवली, त्या पाकिस्तानात आज मुसलमानांचीच काय तर एकणूच नागरिकांची काय दुर्दशा आहे? महागाई, अराजकता, दहशतवादाने पाकिस्तान त्रस्त-ग्रस्त आहे. विविध प्रांतांतून पाकिस्तानमधून फुटून बाहेर पडण्याचे सूर बुलंद झाले आहेत. त्यामुळे इस्लामिक पाकिस्तानचा एवढाच पुळका बाळगणार्यांनी त्या देशाच्या आज झालेल्या दुर्दशेकडे आधी पाहावे आणि भारतात आपण किती सुखी आणि सुरक्षित नांदत आहोत, यासाठी अल्लाचे खरंतर आभारच मानावे.
केवळ आपण मुस्लीम आहोत, म्हणजे पाकिस्तानी झालो, ही संकुचित वृत्ती विकासाकडे नव्हे तर विनाशाकडे नेणारी, हेच पाकिस्तानच्या निर्मितीपासून ते आजवरच्या वाटचालीवरून सर्वार्थाने सिद्ध झाले आहे. तेव्हा, भारतीय मुसलमान असल्याचा खरंतर अभिमान बाळगून आपल्या समाजाच्या विकासासाठी, उन्नतीसाठी या नेतेमंडळींनी पुढाकार घ्यावा. पाकिस्तानचे नाव घेऊन भारतीय मुसलमानांची माथी भडकावण्यापेक्षा, आपल्या पक्षाच्या विकासकामांवर शेखसारख्या शेखचिल्लींनी मतं मागावी आणि मग जिंकून दाखवावे. कारण, धर्म, जाती या आधारावर अशाप्रकारे निवडणुकीत प्रचार करणे हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन तर ठरतेच, पण सामाजिक सलोख्यालाही हे असले जिहादी विचार तितकेच घातक ठरतात.
आज बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडेल. बंगाली जनता दीदींचा भोंगळ-भेदभावपूर्ण कारभार गेल्या एका दशकापासून अनुभवते आहे. पण, आता बंगाली जनताही जागी झाली आहे. तेव्हा, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्याच शब्दांत सांगायचे तर ‘नदीकाठी उभे राहून फक्त पाणी बघितल्याने आपण नदी पार करू शकत नाही.’ तसेच दीदी आणि त्यांच्या चेलेचपाट्यांच्या या जिहादी बांगांनी बंगाली हिंदूंनी वेळीच सावध होण्याबरोबरच, आता मतपेटीतून याचे जोरदार प्रत्युत्तर देण्याची हीच ती वेळ!