मुंब्र्यात फक्त १४ हजार जणांचे लसीकरण का झालं ?

मुंब्र्याची एकूण लोकसंख्या ५ लाख आहे

    30-Dec-2021
Total Views |

mumbra
(प्रातिनिधीक छायाचित्र)
 
 
ठाणे : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू होऊन जवळपास वर्ष लोटल्यानंतरही ठाणे शहरातील सुमारे २५ लाख लोकसंख्येपैकी ६० टक्के म्हणजे १० लाख २३ हजार ठाणेकरांना लसीच्या दोन्ही मात्रा मिळविण्यात यश आले आहे. मात्र, मुंब्रा विभागात लसीकरणाला थंडा प्रतिसाद लाभत असुन जेमतेम १४ हजार ३२६ जणांनीच लसींचे दोन्ही डोस पूर्ण केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
 
 
तर येथील पहिला डोस घेणाऱ्यांची संख्याही २२ हजारांच्याच घरात असल्याने सुमारे ५ लाख लोकसंख्या असलेल्या मुंब्र्यात लसीकरण संथगतीने होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. यासंदर्भात,ठाणे मनपा प्रशासनाकडे संपर्क साधला असता लसीकरणाबाबत प्रशासन अनभिज्ञ असल्याचे दिसुन आले.
 
 
ठाणे जिल्ह्यात १९ जानेवारीला लसीकरण मोहिम सुरू झाली होती पहिल्या टप्यात फ्रंटलाईन वर्कर तसेच शासकिय कर्मचार्‍यांना प्राधान्याने लस दिल्यानंतर १८ वर्ष वयोगटावरील नागरिकांना लस उपलब्ध करण्यात आली. यात ठाणे मनपा क्षेत्रातील सुमारे २५ लाख लोकसंख्येपैकी ७० टक्के म्हणजेच १३ लाख ९५ हजार ८१३ ठाणेकरांनी पहिला डोस तर १० लाख २३ हजार १५३ जणांनी दोन्ही डोस पूर्ण केले आहेत, असे एकुण २४ लाख १८ हजार ९६६ जणांनी ठाण्यात लस घेतली असली तरी यात ठाणेकर नागरीकांऐवजी बाहेरून आलेल्या लसवंताचा भरणा अधिक असल्याचा मतप्रवाह आहे.
 
तेव्हा,अद्याप लाखभर लोकांनी लसीचा पहिला डोसही घेतलेला नसल्याचे दिसुन येते. दरम्यान,प्रशासनाकडील उपलब्ध आकडेवारीनुसार मुंब्रा प्रभागातील पालिकेच्या गांधीनगर आरोग्य केंद्रातुन २२ हजार ४०१ जणांनी पहिला डोस तर १४ हजार ३२६ जणांचे दोन्ही डोस असे एकुण ३६ हजार ७२७ जणांनीच कोविड प्रतिबंधक लस घेतल्याचे आढळुन आले आहे. मुंब्र्यातील अनेकांनी ठाणे शहरातील पालिकेच्या तसेच सिव्हील रुग्णालयातील विविध केंद्रांमधुन लस घेतली. तर, कांही जणानी पालिकेने नेमलेल्या खासगी केंद्रातुन लसीकरण केल्याने परिपूर्ण आकडेवारी पालिकेकडे उपलब्ध नसल्याचे ऊत्तर देण्यात आले.
 
खासगी केंद्रातील सरकारी लसीकरण वादात
 
मुंब्य्रात लसीकरण मोहिमेसाठी खासगी संस्थेची नियुक्ती ठाणे महापालिका प्रशासनाने केली होती.या संस्थेने मनमानी करीत लस गायब करून अनेक खाजगी व्यक्तींना लस पुरवठा केल्याचा आरोप भाजपने केला होता.त्याची चौकशी प्रशासनाने बासनात गुंडाळल्याची चर्चा आहे.तर, कोरोना ओसरू लागल्याने लसीकरणाकडे पाठ फिरवली होती.मात्र आता ओमायक्रॉनच्या धसक्याने लस घेण्यास सुरुवात केली आहे .मात्र,लसीकरणा संदर्भातील काहीच माहिती प्रशासनाकडे नसल्याने मुंब्र्यातील लसीकरण मोहिम वादात सापडली आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

जगभरात भारताच्या डिजिटल प्रगतीची प्रशंसा केली जाते. ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय)ची सेवा जगभरातील काही देशांनी स्वीकारली आहे. भारताची डिजिटल क्षेत्रातील ही प्रगती विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे स्मार्ट पाऊल म्हणावे लागेल. मोदी सरकारला नुकतीच ११ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, सरकारच्या अनेक उपलब्धींपैकी एक असलेल्या डिजिटल व्यवहार प्रणालीचेही विशेषत्वाने कौतुक करण्यात आले. पण, अशापद्धतीने व्यवहार करताना बँक ग्राहकांनी ‘यूपीआय’ आणि ‘डिजिटल वॉलेट’ पेमेंट सिस्टममधील फरक समजून घेण्याबरोबरच खबरदारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121