या ठेवीदारांची संख्या जवळपास ५ लाख इतकी आहे; येत्या दोन महिन्यात ५ लाखांपर्यंतच्या ठेवी परत दिल्या गेल्या तरी रुपी बँकेच्या विलनीकरणावर ह्याचा परिणाम होणार नाहीये. रुपी बँकेच्या ठेवीदारांना ५ लाख पर्यन्तच्या ठेवी परत देण्याचा निर्णय ''ठेव विमा महामंडळाकडून'' (डीआयसीजीसी) घेण्यात आला आहे. या संदर्भात ठेवीदारांना १५ ऑक्टोबर पर्यन्त अर्जासोबत 'केवायसी' कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले होते. त्यानुसार बहुतांश ठेवीदारांनी त्यांचे केवायसी अर्ज जमा केले आहेत. ह्या सर्वांचे अर्ज ''डीआयसीजीसी'' कडे पाठवण्यात आले होते; डीआयसीजीसी ने ह्या कागदपत्रांचे लेखा परीक्षण केल्यानांतर ५ लाख पर्यन्तच्या ठेवी परत करण्याचा निर्णय रुपी बँकेकडून घेण्यात आला आहे. परंतु ह्या ठेवी परत दिल्या गेल्या तरी ज्यांच्या ५ लाखांपेक्षा जास्त ठेवी आहेत त्यांचे ३७० कोटी रुपये बुडतील त्यामुळे रुपी बँकेच्या विलानीकरणाचा प्रयत्न चालूच ठेवावा अशी प्रतिक्रिया सध्या ऐकायला मिळत आहे.
रुपी बँकेकडे सध्या १२९६ कोटी ७३ लाख रुपयांच्या ठेवी आहेत तर बँकेवर ३७१ कोटी रुपयांचे कर्ज आहे. ह्या एकूण प्रक्रियेविषयी रुपी बँकेचे प्रशासक सीए . सुधीर पंडीत यांना विचारले असता,'' ठेवा विमा महामंडळाकडून लेखा परीक्षण पूर्ण झाल्यानंतरत ठेवीदारांना ५ लाख रुपया पर्यंतची रक्कम परत केली जाणार आहे. २०२१ च्या डिसेंबर महिन्या पर्यंत या ठेवी परत केल्या जातील. ठेवी परत करणे आणि बँकेचे विलानीकरण ह्या दोन स्वतंत्र बाबी आहेत; त्यामुळे ५ लाख पर्यन्तच्या ठेवी परत केल्या जाणार असतील तरी ह्याचा बँकेच्या विलनीकरणावर परिणाम होणार नाही'' अशी प्रतिक्रिया दिली.