रुपी बँकेच्या ठेवीदारांना ५ लाख पर्यंतच्या ठेवी येत्या डिसेंबर पर्यंत परत मिळणार.

विलनीकरण किंवा खाजगीकरणावर पण विचार सुरू.

    24-Oct-2021
Total Views | 64

रुपी बँक _1  H
 
 
 पुणे : योग्य तारण न घेता कर्ज दिल्या मुळे पुण्यातील प्रसिद्ध रुपी बँक घाट्यात गेली. त्यामुळे हजारो ठेवीदारांचे कोटी रुपये ह्या यामध्ये बुडाले. पण आता रूपी बँकेच्या ठेवीदारांना थोडा का होईना दिलासा मिळायला लागला आहे. गेल्या आठ वर्षांहून अधिक काळ तात्कळत असलेल्या रुपी बँकेच्या ठेवीदारांना ५ लाख रुपया पर्यंतच्या ठेवी येत्या डिसेंबर ( डिसेंबर २०२१) पर्यन्त परत मिळणार आहेत.

या ठेवीदारांची संख्या जवळपास ५ लाख इतकी आहे; येत्या दोन महिन्यात ५ लाखांपर्यंतच्या ठेवी परत दिल्या गेल्या तरी रुपी बँकेच्या विलनीकरणावर ह्याचा परिणाम होणार नाहीये. रुपी बँकेच्या ठेवीदारांना ५ लाख पर्यन्तच्या ठेवी परत देण्याचा निर्णय ''ठेव विमा महामंडळाकडून'' (डीआयसीजीसी) घेण्यात आला आहे. या संदर्भात ठेवीदारांना १५ ऑक्टोबर पर्यन्त अर्जासोबत 'केवायसी' कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले होते. त्यानुसार बहुतांश ठेवीदारांनी त्यांचे केवायसी अर्ज जमा केले आहेत. ह्या सर्वांचे अर्ज ''डीआयसीजीसी'' कडे पाठवण्यात आले होते; डीआयसीजीसी ने ह्या कागदपत्रांचे लेखा परीक्षण केल्यानांतर ५ लाख पर्यन्तच्या ठेवी परत करण्याचा निर्णय रुपी बँकेकडून घेण्यात आला आहे. परंतु ह्या ठेवी परत दिल्या गेल्या तरी ज्यांच्या ५ लाखांपेक्षा जास्त ठेवी आहेत त्यांचे ३७० कोटी रुपये बुडतील त्यामुळे रुपी बँकेच्या विलानीकरणाचा प्रयत्न चालूच ठेवावा अशी प्रतिक्रिया सध्या ऐकायला मिळत आहे.



रुपी बँकेकडे सध्या १२९६ कोटी ७३ लाख रुपयांच्या ठेवी आहेत तर बँकेवर ३७१ कोटी रुपयांचे कर्ज आहे. ह्या एकूण प्रक्रियेविषयी रुपी बँकेचे प्रशासक सीए . सुधीर पंडीत यांना विचारले असता,'' ठेवा विमा महामंडळाकडून लेखा परीक्षण पूर्ण झाल्यानंतरत ठेवीदारांना ५ लाख रुपया पर्यंतची रक्कम परत केली जाणार आहे. २०२१ च्या डिसेंबर महिन्या पर्यंत या ठेवी परत केल्या जातील. ठेवी परत करणे आणि बँकेचे विलानीकरण ह्या दोन स्वतंत्र बाबी आहेत; त्यामुळे ५ लाख पर्यन्तच्या ठेवी परत केल्या जाणार असतील तरी ह्याचा बँकेच्या विलनीकरणावर परिणाम होणार नाही'' अशी प्रतिक्रिया दिली.

 
अग्रलेख
जरुर वाचा
डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

जगभरात भारताच्या डिजिटल प्रगतीची प्रशंसा केली जाते. ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय)ची सेवा जगभरातील काही देशांनी स्वीकारली आहे. भारताची डिजिटल क्षेत्रातील ही प्रगती विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे स्मार्ट पाऊल म्हणावे लागेल. मोदी सरकारला नुकतीच ११ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, सरकारच्या अनेक उपलब्धींपैकी एक असलेल्या डिजिटल व्यवहार प्रणालीचेही विशेषत्वाने कौतुक करण्यात आले. पण, अशापद्धतीने व्यवहार करताना बँक ग्राहकांनी ‘यूपीआय’ आणि ‘डिजिटल वॉलेट’ पेमेंट सिस्टममधील फरक समजून घेण्याबरोबरच खबरदारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121