एनसीबीचे सिंघम समीर वानखेडेंच्या सुरक्षेत वाढ

समीर वानखेडेंची हेरगिरी होत असल्याचा आरोप एनसीबीने केला होता

    15-Oct-2021
Total Views | 232

Sameer Wankhede_1 &n
मुंबई : महाराष्ट्रामध्ये गेले काही महिने ड्रग्स तस्करी आणि बॉलीवूडचे ड्रग्स कनेक्शन सर्वांसमोर आले. एनसीबीच्या टीमने अनेक ठिकाणी धाडी टाकत अनेक बड्या सेलिब्रेटींना अटक केली. यामध्ये एनसीबीचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांनी केलेल्या कामगिरीचे चांगलेच कौतुक होत आहे. अशामध्ये आता एनसीबीकडून त्यांच्यावर हेरगिरी होत असल्याची शंका व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर आता त्यांची सुरक्षा वाढवली आहे.
 
 
 
समीर वानखेडे सध्या क्रूझवर सापडलेल्या अमली पदार्थांच्या तपासाची देखरेख करत आहेत. समीर वानखेडे यांनी दावा केला होता की, दोन पोलीस त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांनी त्यांचा सुरक्षेसाठी आणखी ४ पोलीस तैनात केले आहेत. वानखेडे वापरत असलेल्या वाहनाची जागा त्यांच्या नवीन सुरक्षा व्यवस्थेचा भाग म्हणून एक एसयूव्ही देण्यात आली आहे. दक्षिण मुंबईतील बॅलार्ड इस्टेट येथील एनसीबी कार्यालयाबाहेर तैनात पोलीस कर्मचाऱ्यांची संख्याही वाढवण्यात आली आहे, अशी माहिती मिळत आहे.
 
 
मुंबई पोलिसांचे दोन कर्मचारी साध्या वेशात पाठलाग करत असल्याची तक्रार एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंनी केल्याचे एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले होते. त्यांनी मुंबई पोलिसांच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांच्याकडे याविषयीची तक्रारही केली होती.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121