पुण्यात कोरोनाग्रस्त पत्रकारांसाठी रा.स्व.संघाचा पुढाकार

    08-Sep-2020
Total Views | 255
Pandurang Raikar_1 &
 


पांडुरंग रायकर मृत्यू प्रकरणानंतर पत्रकारासांठी प्रथमच राखीव बेड



पुणे
: जम्बो रुग्णालयात व्हेंटीलेटर आणि रुग्णवाहिकेअभावी पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाला. पुण्यात वार्तांकन करताना अनेक पत्रकार कोरोनाच्या विळख्यात अडकत आहेत. या पार्श्वभूमीवर सामाजिक दायित्व म्हणून रा.स्व.संघाने पुढाकार घेतला आहे. रा. स्व. संघाशी संलग्न संस्था 'समर्थ भारत संयोजक' सचिन भोसले यांनी डेक्कनवरील 'कर्वे स्त्री शिक्षण संस्था वसतिगृह' येथे सुरू असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये पुण्यातील कोरोनाबाधित पत्रकारांसाठी एकूण ३५ बेड्सची व्यवस्था केली आहे. 
 
 
श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद कुळकर्णी यांना या प्रकरणी माहिती देण्यात आली आहे. पत्रकार संघ आणि कोविड सेंटर यांच्यातील व्यवस्थापनात समन्वय असावा यासाठी एका कार्यकर्त्याची नेमणूक केली जाणार आहे. पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूनंतर पुण्यातील आरोग्य प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. पत्रकारांची अशी अवस्था असेल तर सर्वसामान्यांचे काय, असे प्रश्नही उपस्थित करण्यात आले होते. सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकारांसाठी राखीव कोरोना बेड उपलब्ध करून देणारा पुण्यातील हा पहिलाच उपक्रम मानला जात आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121