'केम छो वरळी !' म्हणत संदीप देशपांडेंचा शिवसेनेवर निशाणा

    23-Sep-2020
Total Views | 68

mns_1  H x W: 0


मुंबई :
मंगळवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची झोप उडाली आहे.वरळी परीसरातील अनेक चाळींमध्ये लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. त्यामुळे वरळीकरांना नाहक त्रासाला सोमोरे जावे लागत आहे. याबाबतचा मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी वरळीतील एक व्हिडीओ शेअर करत लोकांची उडालेली तारांबळ दाखवून दिली. यावेळी त्यांनी शिवसेना व मुंबई महापालिकेवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.त्यांनी व्हिडीओ शेअर करताना ट्वीट करत ‘केम छो वरळी’, असे म्हणत पालिकेच्या कामावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

तर मुंबईकरांनी सरकारकडून कुठलीही अपेक्षा ठेवून नये, अशी टीका भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केली आहे. “विदर्भ,पश्चिम महाराष्ट्र, कोकणासह अनेक भागात पावसाने उभ्या पिकांचे अतोनात नुकसान केले. या हाहाकाराकडे, उद्ध्वस्त शेतकऱ्यांकडे ठाकरे सरकारने ना पाहिले, ना मदत. त्यामुळे मुंबईकर हो! सरकारच्या दुष्टीने मुंबईतील पूर म्हणजे नेहमीचाच पावसाळा ?? शांतता राखा! बदल्या, टेंडर वाटप सुरु आहे!”



भारतीय हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचे तसेच, नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.येत्या २४ तासांत मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण मुंबईसह पश्चिम उपनगरांतही पावसाने धुमाकूळ घातला आहे. कुर्ला-दादर दरम्यान रुळांवर पाणी साचलं असून मध्य रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.मुंबईमध्ये काल संध्याकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. याचा थेट परिणाम मुंबईच्या सखल भागांवर झालेला आहे. मुंबई मधील परळ, दादर, सायन, वांद्रे, अंधेरी, मालाड, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, मुलुंड परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे येथील सखल भागात मोठ्या प्रमाणत पाणी साचलं आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांनाही नदीचं रूप आलं आहे. अंधेरी येथील सब वेमध्ये चार ते पाच फूट पाणी भरल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. येथे भरलेल्या पाण्यात काही रिक्षा वाहून आल्या तर बेस्टची बस देखील अडकून पडली होती.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121