अजित डोवाल यांनी केली चीनशी चर्चा : 'एलएसी'वरून चीनची माघार

    06-Jul-2020
Total Views |
Ajit Doval _1  




नवी दिल्ली : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी रविवारी चीनचे परराष्ट्र मंत्री आणि स्टेट काऊन्सलर वांग यो यांच्यासोबत व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. दोन्ही बाजूंना सकारात्मक बाबींवर चर्चा झाल्यानंतर चीनी सैन्याने सोमवारी गलवान खोऱ्यातून तसेच पेंगॉग त्सो भागातून आपले सैन्य मागे घेतले आहे. 



गेल्या काही दिवसांपासून भारतातर्फे टाकण्यात येत असलेला आंतरराष्ट्रीय दबाव, रणनिती, सीमेवरील शक्तीप्रदर्शन, भारतीय लष्करातर्फे देणाऱ्या येणाऱ्या जशास तशा उत्तरानंतर चीनने आता माघार घेण्यास सुरुवात केली आहे. एलएसीवरील तंबू हटवण्यास चीनने सुरुवात केली आहे. सैनिकांना मागे घेणार असल्याचे या चर्चेत चीनतर्फे कबूल करण्यात आले होते. 




India Map _1  H


सोमवारी लष्करी अधिकारी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनचे सैन्य दीड ते दोन किमी माघार घेणार असल्याचे समजते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांपूर्वी लेह दौऱ्यावर गेले होते. तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी जवानांना व तिथल्या कमांडरला पूर्णपणे सुट दिली होती. देशातही चीनविरोधात मोठा असंतोष निर्माण झाला होता. 




चीनी सैनिक सद्यस्थितीत जिथे तैनात आहेत, त्या भागावर भारतीय सैन्य नजर ठेवून आहे. भारतीय जवान या ठिकाणी दीर्घकाळासाठी तैनात राहू शकतात, येत्या काळात लडाखमध्ये वातावरणात कडक थंडी पडू लागेल. या परिस्थितीत तग धरून राहण्यासाठी सैन्यासाठी आवश्यक ती सर्व रसद पुरवण्यात येणार आहे. भारतीय सैन्य ऑक्टोबरपर्यंत इथे तैनात राहणार आहे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. 



India Map _2  H



गलवान खोऱ्यात पाण्याची पातळी वाढत चालली आहे. चीनी सैन्य मागे हटण्याचे हे देखील एक कारण मानले जात आहे. सॅटलाईट्सद्वारे टीपलेल्या दृश्यांमध्ये चीनी सैन्यांच्या तंबूंच्या दिशेने पाणी भरत चालले आहे. चीनी सैन्याला यामुळे सहाजिकच मागे जावे लागणार आहे, हिंदुस्तान टाईम्स या इंग्रजी वृत्तपत्रांने याबद्दल माहीती दिली आहे.






India Map _3  H





 
अग्रलेख
जरुर वाचा
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्ष पदार्पणानिमित्त विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर ; पनवेल एमकेसीएलच्या वतीने आयोजन

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्ष पदार्पणानिमित्त विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर ; पनवेल एमकेसीएलच्या वतीने आयोजन

दानशूर व्यक्तिमत्त्व आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांच्या वयाच्या ७५ व्या अर्थात अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले असून त्या निमित्ताने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन केले आहे. याच उपक्रमांतर्गत महाराष्ट्र ज्ञान महामंडळ(एमकेसीएल) पनवेल यांच्या वतीने पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी 'भरारी २०२५' हे करिअर विषयक मोफत मार्गदर्शन शिबीर पनवेल येथे आज (दि. १०) आयोजित करण्यात आले...

अनुसूचित जाती-जमातींना सरसकट १३ आणि ७ टक्के आरक्षणाची शिफारस करणार; अनुसूचित जाती जमाती आयोग; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत निर्णय

अनुसूचित जाती-जमातींना सरसकट १३ आणि ७ टक्के आरक्षणाची शिफारस करणार; अनुसूचित जाती जमाती आयोग; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत निर्णय

महाराष्ट्र शासनाने ज्या पद्धतीने इतर मागासवर्ग समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २७ टक्के आरक्षण दिले आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींकरिता सर्व महानगरपालिका, नगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये सरसकट १३ व ७ टक्के आरक्षण द्यावे, अशी शिफारस राज्य शासनाकडे करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी मंगळवार, दि. १० जून रोजी याबाबत माहिती दिली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121