मुंबई : मुंबईत फोर्ट परिसरात भानुशाली इमारतीचा भाग कोसळला. इमारतीच्या ढीगाऱ्याखाली दोन ते तीन कुटूंबे अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान,या इमारतीच्या ढीगाऱ्याखालून सहा जणांना बाहेर काढण्यात आले. तर या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. यात सह जण जखमी झाले आहेत. अन्य कुणी या ढीगाऱ्याखाली अडकले आहेत का याबद्दलचा तपास सुरू आहे. मुंबईत जीपीओ भागात अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दरम्यान, महापौर किशोरी पेडणेकर घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. पोलीस प्रशासनही घटनास्थळी उपस्थित आहे.
सायंकाळी पावणे पाच वाजता या इमारतीचा भाग कोसळला. त्यानंतर प्रशासनाने आजूबाजूचा परिसर रिकामी केला. जीपीओच्या समोरच्या भागातील वाहतूकीवर परिणाम झाला आहे. महापौर किशोरी पेडणेकर घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. रुग्णवाहिकाही घटनास्थळी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. या ढीगाऱ्याखालून दोन व्यक्तींना बाहेर काढण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्या आहेत.
इमारत ही म्हाडाची उपकर इमारत होती. या इमारतीच्या मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. मुंबईतील १६ हजार धोकादायक इमारतींचा प्रश्न लक्षात घेत पूर्नविकासासाठी प्लान तयार करणार असल्याचे आश्वासन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिले.