भानूशाली इमारतीच्या ढीगाऱ्याखाली दोन जणांचा मृत्यू

    16-Jul-2020
Total Views | 46

Mumbai _1  H x




मुंबई : मुंबईत फोर्ट परिसरात भानुशाली इमारतीचा भाग कोसळला. इमारतीच्या ढीगाऱ्याखाली दोन ते तीन कुटूंबे अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान,या इमारतीच्या ढीगाऱ्याखालून सहा जणांना बाहेर काढण्यात आले. तर या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. यात सह जण जखमी झाले आहेत. अन्य कुणी या ढीगाऱ्याखाली अडकले आहेत का याबद्दलचा तपास सुरू आहे. मुंबईत जीपीओ भागात अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दरम्यान, महापौर किशोरी पेडणेकर घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. पोलीस प्रशासनही घटनास्थळी उपस्थित आहे. 






सायंकाळी पावणे पाच वाजता या इमारतीचा भाग कोसळला. त्यानंतर प्रशासनाने आजूबाजूचा परिसर रिकामी केला. जीपीओच्या समोरच्या भागातील वाहतूकीवर परिणाम झाला आहे. महापौर किशोरी पेडणेकर घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. रुग्णवाहिकाही घटनास्थळी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. या ढीगाऱ्याखालून दोन व्यक्तींना बाहेर काढण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्या आहेत.


इमारत ही म्हाडाची उपकर इमारत होती. या इमारतीच्या मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. मुंबईतील १६ हजार धोकादायक इमारतींचा प्रश्न लक्षात घेत पूर्नविकासासाठी प्लान तयार करणार असल्याचे आश्वासन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिले. 



 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121