प्रजासत्ताक दिनी लंडनमध्ये भारतीय संविधान जाळण्याचा पाकिस्तानचा कट

    23-Jan-2020
Total Views | 52


uk_1  H x W: 0



युके : ब्रिटनमध्ये वास्तव्याला असलेल्या पाकिस्तानी वंशाच्या नागरिकांनी लंडनमधील भारतीय दूतावासाबाहेर आंदोलन आणि भारतीय संविधानाच्या प्रती जाळण्याचा कट रचला आहे. पाकिस्तानी वंशाच्या नागरिकांच्या या संभाव्य आंदोलनाबद्दल भारतीय उच्चायुक्तांनी यूकेच्या प्रशासनाकडे चिंता व्यक्त केली आहे.



लंडनमधील भारतीय उच्चायुक्त रुची घनश्याम यांनी यूकेच्या गृहसचिव प्रिती पटेल यांना फोन केला व संविधानाच्या प्रती जाळण्याच्या या कटाबद्दल चिंता व्यक्त केली. भारतीय उच्चायुक्तांनी गृह सचिव प्रिती पटेल यांच्याबरोबर भारत-ब्रिटन संबंध अधिक बळकट कसे होतील याबद्दल फोनवरुन चर्चा केली. प्रजासत्ताक दिनी पाकिस्तानी वंशाच्या नागरिकांच्या आंदोलनामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्याबद्दलची चिंता त्यांनी गृह सचिवांच्या कानावर घातली अशी माहिती उच्चायुक्तालयाने टि्वट करुन दिली आहे.



भारतीय वंशाच्या नागरिकांनी युकेच्या यंत्रणांशी पत्रव्यवहार करुन या संभाव्य आंदोलनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. २६ जानेवारीला आंदोलन करण्यासाठी पाकिस्तानकडून मोठया प्रमाणावर लोकांना गोळा करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पाच हजार लोक या आंदोलनात सहभागी होतील अशी शक्यता आहे.

 

अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121