पाककडून 'गझनवी' क्षेपणास्त्राची चाचणी

    29-Aug-2019
Total Views | 62





नवी दिल्ली
: 'कलम ३७०' रद्द केल्यापासून पाकिस्तानची पळता भुई थोडी झाली आहे. अशातच पंतप्रधान इमरान खान यांच्या निर्णयांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील पाकिस्तानची कोंडी करण्यात येत आहे. विरोधकांकडून 'काश्मीर सोडा पीओके वाचवा' अशी नारेबाजी केली जात आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था पूर्णतः डबघाईला गेली आहे. अशातच पाकिस्तान भारताला वारंवार युद्धाच्या पोकळ धमक्या देत आहे. आता भारतासह संपूर्ण जगाचे आपल्याकडे लक्ष वेधले जावे, या हेतूने पाकिस्तानने 'गझनवी' बॅलिस्टिक या वारंवार चाचण्या केलेल्या क्षेपणास्त्राची काल रात्री पुन्हा चाचणी केली.

 


हे क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे आहे. जवळपास २९० किलोमीटर अंतरापर्यंत हे क्षेपणास्त्र मारा करते. या क्षेपणास्त्राच्या चाचणीसाठीच पाकिस्तानने कराचीचा हवाई मार्ग बंद ठेवला होता. पाकिस्तानी लष्कर प्रवक्ते मेजर जनरल असिफ गफूर यांनी दिलेल्या माहितीनुसार
, पाकिस्तानातील कराचीजवळ सोनमियानी प्रक्षेपण चाचणी केंद्रावरून 'गझनवी' क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. ही चाचणी रात्रीच्या वेळेस करण्यात आल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केला. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनीही सैन्याचे या चाचणीबद्दल अभिनंदन केले आहे.




या कृतीतून पाकिस्तान भारताला युद्धाचा इशारा देण्याचा प्रयत्न करत आहे. 'कलम ३७०' रद्द केल्यानंतर आता  पाकव्याप्त काश्मीरही आपल्या हातातून जाते की  काय, असे पाकिस्तानला वाटते आहे. त्यामुळे इमरान खान सरकारमधील नेते वारंवार भारताला आमच्या नादी लागू नका
 नाहीतर युद्ध करू, असे इशारे देत आहे. काल तर पाकिस्तानचे मंत्री शेख रशीद यांनी युद्धाची तारीखदेखील जाहीर केली. ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या दरम्यान भारत पाकिस्तान यांच्यात युद्ध होणार असून मी नागरिकांना सतर्क राहण्याचे इशारे द्यायला इथे आलो आहे, असे त्यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले आहे. परंतु, पाकिस्तानच्या या नापाक कृत्यामुळे सीमारेषेवरील तणावात आणखी भर पडणार आहे.

 

अग्रलेख
जरुर वाचा
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या बांधणीला आता गती मिळणार आहे. प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्‍या जुळ्या बोगद्यासाठी आवश्‍यक असलेली १९.४३ हेक्‍टर वनजमीन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडे वळती करण्‍यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता मिळाली आहे. त्‍यानुसार, अटी व शर्तींचे अनुपालन तसेच पूर्ततेची ..

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

१ हजार ६५० गावांमध्ये प्राथमिक, तर ६ हजार ५५३ गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नाहीत राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांपैकी सुमारे १८ हजार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे. तर १ हजार ६५० गावांत प्राथमिक आणि ६ हजार ५५३ गावांत उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नाहीत. विद्यार्थी संख्येत घट झाली असली, तरी त्या शाळा सुरूच राहतील आणि त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, तेथे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याची माहिती ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121