एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची पुष्टी

    08-May-2019
Total Views | 125



नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोटमधील दहशतवादी अड्ड्यांवर केलेल्या एअर स्ट्राईकबाबत एक नवीन खुलासा करण्यात आला आहे. नवा खुलासा भारताने केलेल्या दाव्यांची पुष्टी करणारा आहे. भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकबाबत विदेशी पत्रकाराने दावा केला की, "या एअर स्ट्राईकमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या १३० ते १७० दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला."

 

पत्रकार फ्रान्सेस्का मॅरिनो यांनी हा दावा केला असून त्यांनी आपल्या अहावालात म्हटले की, "स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तानातील शिबिरांत अजूनही जवळपास ४५ दहशतवाद्यांवर उपचार सुरू आहेत. सोबतच जवळपास २० लोकांचा मृत्यू उपचारांदरम्यान झाला," असेही मॅरिनो यांनी म्हटले आहे. तथापि, एअर स्ट्राईक झालेल्या भागाला अजूनही पाकिस्तानी सैन्याने घेराव घातलेला आहे. परंतु, हल्ल्यातील जखमींवर रुग्णालयात नव्हे तर एका अस्थायी ठिकाणी उपचार करण्यात येत आहेत.

 

पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलाने दि. २६ फेब्रुवारीला एअर स्ट्राईक केला होता, ज्यावरून भारतात राजकीय पक्षांत वाद-प्रतिवाद सुरू आहेत. आधीही भारतीय सैन्याने एअर स्ट्राईकशी संबंधित अनेक पुरावे सार्वजनिक केले होते. आता मात्र एका विदेशी पत्रकाराने भारतीय हवाई दलाच्या कारवाईत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची पुष्टी केली आहे. तथापि, मॅरिनो यांनी एअर स्ट्राईकमुळे १७० दहशतवादी ठार झाल्याचे म्हटले आहे. दरम्यान, माध्यमांतील वृत्तांनुसार संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रतिबंध समितीने जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ घोषित केल्याच्या काही दिवसांनंतर फ्रान्सेस्का मॅरिनो यांनी आपला अहवाल सार्वजनिक केला आहे.

 

भारत करणार एअर स्ट्राईकदरम्यान वापरलेल्या ‘त्या’ बॉम्बची खरेदी

 

हवाई दलाने एअर स्ट्राईकदरम्यान वापरलेल्यास्पाईस २०००’ बॉम्बची पुन्हा एकदा इस्रायलकडून खरेदी करण्यात येणार आहे. पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तानात घुसून बालाकोटमधील दहशतवादी अड्ड्यांवर केलेल्या कारवाईवेळी हवाई दलाने ‘स्पाईस २०००’ बॉम्बचा वापर केला होता. या बॉम्बने अचूक निशाणा साधत जैश-ए-मोहम्मदसह अन्य दहशतवादी संघटनांचे तळ उद्ध्वस्त केले होते. ताफ्यातील शस्त्र आणखी अत्याधुनिक करण्यासाठी हवाई दलाकडून ‘स्पाईस २०००’ बॉम्बची खरेदी करण्यात येणार आहे. कोणत्याही इमारतीला उद्ध्वस्त करण्यासाठी योजनाबद्ध पद्धतीने या बॉम्बचा वापर करता येतो. या बॉम्बच्या आधीच्या व्हर्जनमध्ये इमारतीला भेदण्याची आणि त्यानंतर इमारतीत स्फोट घडविण्याची क्षमता होती. स्पाईस इंग्रजीतल्या SPICE शब्दाने (Smart, Precise Impact, Cost-Effective) तयार झाला आहे. स्पाईस बॉम्ब तीन प्रकारचे आहेत-स्पाईस १०००, स्पाईस २००० आणि स्पाईस २५०. स्पाईस २००० चे वजन ९०० किलो असते, ज्यात पुढच्या भागात MK-84, BLU-109 आणि RAP-2000 सह कितीतरी प्रकारचे बॉम्ब लावलेले असतात. स्पाईस बॉम्बव्यतिरिक्त भारतीय हवाई दलाने ‘सुखोई-३०’ लढाऊ विमानालादेखील आपल्या ताफ्यात सामील करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ज्यामुळे सैन्याच्या क्षमतेत आणखी वाढ होईल आणि शत्रूबरोबरील हवाई संघर्षात जोरदार मुकाबला करू शकेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121