नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फेसबुकला देण्यात आलेल्या निर्देशांनुसार कडक कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. फेसबूकने काँग्रेसच्या आयटी सेलशी संबंधित असलेल्या अकाऊंट्स आणि पेजेसवर मोठी कारवाई केली. आक्षेपार्ह भाषेचा वापर करण्यात आलेल्या ६८७ फेसबुक पेज आणि अकाऊंट्स फेसबुकने हटवली आहेत. दरम्यान ही कारवाई फेसबुकने तयार केलेल्या एका स्वयंचलीत यंत्रणेद्वारे झाली असल्याचे फेसबुने सांगितले आहे.
'आमच्या स्वयंचलिक प्रणालीद्वारे निर्देशित केलेल्या ६८७ फेसबूक अकाऊंट्स व पेजवर कारवाई करून हटवण्यात आल्याचे फेसबुकने म्हटले आहे. या पेजवर अप्रामाणिक माहीती शेअर केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. कारवाई केलेली पेज आणि अकाऊंट्स वैयक्तिकरीत्या काँग्रेसच्या आयटी सेलशी निगडित होती,'' असे फेसबुकने या कारवाईूबाबत माहिती देताना म्हटले आहे.
डिलीट करण्यात आलेल्या या पेजचे अॅडमिन आणि अकाऊंटधारक स्थानिक बातम्या, आगामी निवडणुकीसंदर्भातील राजकीय मुद्दे, उमेदवारांची भूमिका मांडत असत. भाजपासह काँग्रेसच्या इतर विरोधकांवर या पेजेस आणि अकाऊंट्सवरून टीका करण्यात येत होती. ही पेजेस आणि अकाऊंट्स काँग्रेसच्या आयटी सेलशी वैयक्तिकरीत्या जोडली गेली होती. याचा विचार करत फेसबुकने ही कारवाई केली आहे.
फेसबूकचे सायबर सिक्यॉरिटीचे पॉलिसी प्रमुख नाथनेल ग्लेचियर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारवाई करण्यात आलेल्या अकाऊंट्शी संबंधित व्यक्तींनी आपली ओळख लपवून काम करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आम्ही केलेल्या तपासामध्ये ही मंडळी काँग्रेसच्या आयटी सेलशी संबंधित असल्याचे उघड झाले. त्यांना अकाऊंटच्या वॉलवर असलेल्या माहितीमुळे नाही तर ओळख लपवून केलेल्या अप्रामाणिकपणामुळे हटवण्यात आले आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat