पठाणकोट : पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर नाकेबंदी करण्यात भारताने पुरेपूर प्रयत्न केले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही भारताच्या वाटचे पाणी पाकिस्तानला न देता ते पंजाब आणि काश्मिर प्रांतात धरण बांधून रोखणार असल्याचे सांगितले होते. आता पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी पाकिस्तानात जाणारे पाणी अडवण्याचा निर्णय घेतला आहे. पठानकोट येथील धरणाच्या कामाचे शुक्रवारी भूमिपूजन केले जाणार आहे.
पंजाब सरकारने या धरणासाठी २०६ कोटी रुपये मंजूर केले आहेत. एकूण खर्च २७०० कोटी आहे. पुलवामा येथील सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, पाकिस्तानची सार्वत्रिक कोंडी करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास भारताने तयारी सुरू केली. सिंधू करारानुसार भारताच्या वाट्याला आलेल्या तीन नद्यांचे पाणी पाकिस्तानात जात होते. ते रोखण्यासाठीही केंद्र सरकारने राष्ट्रीय प्रकल्प सादर केला आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat