रायगडमधील १९ गावांना भुस्खलनाचा धोका!

    08-Jul-2024
Total Views | 56
 
Landslide
 
रायगड : राज्यात सर्वत्र पावसाचा हाहाकार माजला आहे. मुंबई आणि कोकण भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाळ्यात अनेक ठिकाणी भुस्खलन होण्याची शक्यता जास्त असते. अशातच आता एका सर्वेक्षणात रायगडमधील १९ गावांना भुस्खलनाचा धोका असल्याचे सांगण्यात आले आहे.
 
भूगर्भशास्त्र विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार, महाडमधील नऊ, पोलादपूरमधील सहा, महासाळा, कर्जत, श्रीवर्धन आणि खालापूर तालुक्यातील प्रत्येकी एका गावाला भुस्खलनाचा धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे.
 
हे वाचलंत का? -  एक्सप्रेस रद्द, लोकल ठप्प! मुंबईत पावसामुळे प्रवाशांचे हाल
 
याआधीही २०२१ मध्ये महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून अनेक जणांचा मृत्यू झाला. याशिवाय मागच्या वर्षी इर्शाळवाडीमध्ये दरड कोसळून ८४ जणांचा बळी गेला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा रायगड जिल्ह्यात दरड कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

हिंदू समाजाने जागृत होणे अत्यावश्यक: सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण होतील. संघाचा जन्म, जन्मापासून करावा लागलेला संघर्ष, विस्तार व आज समाजातील सर्वच क्षेत्रांवर संघाचा पडलेला लक्षणीय प्रभाव, या सार्‍या प्रक्रियांबाबत समाजात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही कमालीचे कुतूहल आहे. यांसारख्या विविध विषयांवर ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर, ‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर, सा. ‘विवेक’च्या संपादक अश्विनी मयेकर आणि मल्याळम दैनिक ‘जन्मभूमी’चे सहसंपादक एम. बालकृष्णन यांनी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.....

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121