समुद्री हल्लाच्या तयारीत पाक; नौसेना प्रमुखांनी साधला निशाणा

    05-Mar-2019
Total Views | 62
 


नवी दिल्ली : नौसेना प्रमुख सुनील लांबा यांनी पुलवामा हल्लाबद्दल पाकिस्तानचे नाव न घेता निशाणा साधला आहे. भारताला अस्थिर ठेवू पाहणाऱ्या शेजारी देशाला भारतीय वायुसेनेने नुकताच धडा शिकवला आहे. आता दहशदवाद पोसणाऱ्यांकडून भारताच्या सीमांवर समुद्रीमार्गे हल्ला करण्याचा कट रचला जात असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. दहशतवाद्यांना समुद्रामार्गे हल्ला करण्यासाठी प्रशिक्षित केले जात आहे. जम्मू काश्मिरमध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्यात ४० सीआरपीएफच्या जवान शहिद झाले. यापूर्वी २६/११ हल्ल्यावेळी दहशतवादी समुद्री मार्गाने घुसले होते.

 

दहशतवाद ही आंतरराष्ट्रीय समस्या

 

नौसेना प्रमुखांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील विशेषज्ञांच्या परिषदेत त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. गेल्या काही वर्षात दहशतवादाने डोके वर काढल्याचे त्यांनी सांगितले. दहशतवादापासून धोका नाही, असे फार कमी देश आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर ही मोठी समस्या असल्याचे ते म्हणाले.

 

पाकवर नाव न घेता निशाणा

 

नौसेना प्रमुखकांनी भारताला दहशतवादामुळे कराव्या लागणाऱ्या समस्यांबद्दल सांगताना पाकिस्तानचे नाव न घेता निशाणा साधला. ते म्हणाले,. भारताच्या शेजारील देश दहशतवाद्यांच्या मदतीने भारताला अस्थिर करू पाहत आहेत. मात्र, आम्हीही त्यांना चोख प्रत्युत्तर देत दहशतवाद्यांचा तळ उध्वस्त केला.

 

दरम्यान मंगळवारी पाकिस्तानी नौसेनेने भारत पाकच्या हद्दीत घुसखोरी करत असल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानी नौदलाने या प्रकरणी एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. मात्र, भारतीय नौदलाने हा दावा फोल ठरवला आहे. पाकिस्तान आपली सीमा सांगत आहे ती आंतरराष्ट्रीय सीमा असल्याचे भारतीय नौदलाने स्पष्ट केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121