मुंबई : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसंदर्भात राज्यपालांकडे मागणी करण्यासंदर्भात काढण्यात आलेल्या मोर्चा पोलीसांनी अडवला आहे. या आंदोलन व मोर्चासाठी पूर्वपरवानगी घेण्यात आली नसल्याचे सांगत पोलीसांनी हा मोर्चा अडवला. आमदार बच्चू कडू यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. यासह प्रहार जनशक्ती पक्षाच्या अन्य कार्यकर्त्यांनाही यावेळी ताब्यात घेण्यात आले आहे. कार्यकर्त्यांनी पोलीसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला होता.