मुंबईच्या पावसाने मोडला चेरापुंजीचा विक्रम!

    25-Jun-2018
Total Views | 32




 

 
मुंबईच्या विविध भागांत मुसळधार पाऊस


मुंबई: मुंबईतल्या पावसाने भारतातील सर्वात जास्त पर्जन्यमान असलेल्या चेरापुंजीचा विक्रम मोडला आहे. चेरापुंजीत रविवारी २२८ तर मुंबईत गेल्या २४ तासांत २३१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. मुंबई, मुंबई उपनगरे, ठाणे, कोकण किनारपट्टीतल्या भागात अद्याप पावसाचा जोर कायम आहे. मागील २४ तासांत मुंबईत २३१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. यंदाच्या हंगामातला हा सर्वाधिक पाऊस ठरला. रविवारी चेरापुंजीत २२८ मिमी पावसाची नोंद झाली होती. मात्र मुंबईने गेल्या २४ तासांत हा विक्रम मोडीत काढला आहे.

 
 
सोमवारी सकाळपासूनच मुंबईकरांना मुसळधार पावसाने चिंब केले. शनिवारपासून सुरू झालेल्या पावसाने रविवारी रात्री चांगलाच जोर धरला. शनिवारपासून सुरू झालेल्या पावसाने रविवारी रात्री चांगलाच जोर धरला. सोमवारी सकाळी पावसामुळे मुंबईतील अनेक भाग जलमय झाले होते. सखल भागात पाणी साचल्यामुळे नेहमीप्रमाणे वाहतूककोंडी झाली, तर सायन, कुर्ला येथे रेल्वेट्रॅकवर पाणी आल्याने मुंबईची जीवनरेखा असलेल्या रेल्वेचा वेगही मंदावला. तिन्ही मार्गांवरील (मध्य, पश्‍चिम आणि हार्बर) रेल्वे सोमवारी सकाळी १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यामुळे कामावर जाणार्‍या नोकरदारांचे हाल झाले. अनेकांनी पावसाचा रागरंग पाहून कामावर येण्याऐवजी सुट्टी घेणे किंवा घरातून काम करणे पसंत केले. बेस्टनेही मुंबईत पाणी साचल्यामुळे ४७ मार्गांमध्ये बदल केला होता.
अग्रलेख
जरुर वाचा
२५ जून : आणीबाणीच्या काळ्या आठवणी जागविण्याचा दिवस

२५ जून : आणीबाणीच्या काळ्या आठवणी जागविण्याचा दिवस

आज आपण सर्वजण स्वातंत्र्याचा अनुभव घेतोय. कोणीही, कधीही, कुठेही जाऊ शकतो, मनासारखे (झेपेल त्याप्रमाणे) काहीही करू शकतो. मग विषय कोणताही असो. ‘कोरोना’चा असो किंवा चिनी घुसखोरीचा, शेतकर्‍यांच्या प्रश्नांचा विपर्यास करण्याचा, दि. २६ जानेवारी रोजीच्या राजधानीत घातलेल्या धुडगुसाचे निर्लज्ज समर्थन करण्याचा, खलिस्तानचे समर्थन करण्याचा, ‘वॅसिन’च्या प्रश्नावर दिशाभूल करण्याचा, स्वतःच्या अकार्यक्षमतेचे खापर निर्लज्जपणे केंद्र सरकारवर फोडण्याचा, केतकीच्या कवितेवरून तिला चार महिने तुरुंगवारी घडविण्याचा आणि मोदींना ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121